आरएसएस आणि वर्तमान राजकारण

नोव्हेबर, २०२२ला श्रद्धा वालकर-आफताब प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर पुढचं वर्षभर मुस्लिम समुदायाविषयी अपसमज, तिरस्कार, द्वेष आणि घृणा तयार करून सामाजिक भेद निर्माण केला गेला. आरएसएस त्याच्या इतर समर्थक संघटनांनी वेगवेगळी नावं धारण करून देशभरात मोर्चे काढले

सरकारसमर्थित असलेले हे सर्व मोर्चे मुस्लिमविरोधी होती. प्रत्येक मोर्चात मुस्लिम समाजाविषयी उघड-उघड हिंसक भाषा केली गेली. धमकी देण्यात आली. त्यांना व त्यांच्या धर्माला अपमानित करण्यात आलं. एका कौटुंबिक हिंसाचाराला धर्मयुद्धाचा रंग देऊन मुस्लिमविरोधी जनमानस तयार केला गेला. परिणामी औरंगाबाद, जालना, अकोला, अहमदनगर, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर सारख्या शहर-परिसरात मुस्लिम समुदायाविरोधात दंगली, जातीय द्वेश, हिंसाचार, सांप्रदायिक वाद, वांशिक हल्ले व हेट क्राइम घडविला गेला.

वास्तविक, केंद्र व राज्यात आरएसएसप्रणित भाजप सरकार सत्तेत होतं. मग कल्पित ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करण्याची मागणी जनतेला का केली गेली? कायदा कोण करतं, सरकार की जनता? अर्थातच मुस्लिम समुदायाला खलनायक ठरवून त्यांच्याविरोधात सर्वसामान्य हिंदूंना हिंसेला उत्तेजित करण्याचे ते उघड षडयंत्र होतं. झालंही तेच. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’ने (एनसीआरबी) २०२३मध्ये झालेल्या जातीय दंगलीत महाराष्ट्राला अव्वल स्थानी ठेवलं आहे. राज्यातील या दंगली श्रद्धा वालकर हत्येनंतर निघालेल्या ‘सकल हिदू मोर्चा’मुळे झालेल्या आहेत, हे वेगळं सागण्याची गरज नाही. डिसेंबर २०२३मध्ये जारी एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल ८,२१८ दंगलीचे गुन्हे दाखल झाले. दंगलीमुळे राज्यातील ९,५५८ नागरिक प्रभावित झाले. सांप्रदायिक घटनांवर नजर ठेवणाऱ्या ‘हिंदुत्व वॉच’ या संस्थेनेही महाराष्ट्रातील वाढत्या दंगलीवर चिंता व्यक्त केली होती.

दीड वर्षानंतर मार्च २०२४ रोजी वालकर प्रकरणातलव्ह जिहादचा आरोप खोटा दिशाभूल करणारा होता, असा निर्वाळान्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अथॉरिटीने दिला. मुस्लिम समुदायाला बदनाम करणे त्यांच्याविरोधात द्वेष पसरवण्याचा ठपका संस्थेने ठेवला. इतकंच नाही तरएनबीडीएसएनेटाईम्स नाऊ नवभारत, ‘न्यूज-१८ इंडियाआणिआज तकला मोठा आर्थिक दंड ठोठावला. याशिवाय संबंधित कार्यक्रमांचे ऑनलाइन व्हिडिओ दिवसांच्या आत हटवण्याचे आदेश दिले.

वाचा : दादुमियाँ : ‘धास्तावलेला’ हिंदुत्ववादी लेखक

वाचा : चिकित्सा डॉ. आंबेडकरांच्या ‘हिंदुकरणा’ची 

वाचा : आरएसएसप्रणीत वर्तमान राजकारणाचा इतिहास : 'मनुचा मासा'

अर्थात श्रद्धा वालकर-आफताब कल्पित लव्ह जिहाद प्रकरण फसवं आणि बुद्धिभेद घडविणारे होतं, हे सिद्ध झालं. परंतु त्याचा आधार घेऊन तयार केलेल्या द्वेषाणूने कितीतरी मुस्लिमांचे बळी घेतले होते. एनबीडीएसएने दिलेल्या आदेशामुळे मृतांचे जीव परत येणार नव्हते. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीच्या हल्ल्यात मारला गेलेला नूर हसन शिकलगार जीवंत होणार नव्हता.

आरएसएस असो वा त्यांच्या समविचारी फॅसिस्ट संघटना भारतात गेल्या अनेक दशकापासून द्वेशाचं राजकारण करीत आलेल्या आहेत. इतिहासाचा आधार घेऊन जनसामान्याची दिशाभूल करणे, वादाचे मुद्दे उपस्थित करणे, अर्धसत्य माहिती प्रसारित, मुस्लिमांचं अमानवीकरण करणं, त्यांना राष्ट्रद्रोही हिंसक ठरवित आलेल्या आहेत. २०१४ पासून तर कुठल्याही सामान्य विषयावरून हिंदू-मुस्लिम वाद उभा करणं या संघटनेचं वैशिष्ट्य झालेलं आहे. भाजप-संघाच्या कृपेने स्थापन केलेल्या आयटी सेलने निरर्थक वादांना मुस्लिमद्वेशाचा रंग दिला. त्यातून २४ तास मुस्लिमविरोधी वातावरण तयार करण्याचं काम मीडियाने केलं.

भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचं सामाजिक, सांस्कृतिक उद्धवस्तीकरण करण्यात ही संघटना नेहमी तत्पर असते. अर्धसत्य खोटी माहिती प्रसारित करून सामाजिक विद्वेश तयार करून राजकीय सत्ता हस्तगत करणं फॅसिस्ट संघटनांचं आद्यकर्तव्य राहिलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचं कार्य बुद्धिभेद घडविणं, द्वेशतंत्राचा वापर करत अफवा पसरवणं त्यातून समाजमन कलुषित करणं इत्यादी राहिलेलं आहे.

येल विद्यापीठाचे प्रा. जेसन स्टॅन्लीहाऊ फॅसिझम वर्क्सपुस्तकात फॅसिझम संबंधी काही विधाने केली आहेत. ती भारतातील फॅसिस्ट संघटनांना तंतोतंग लागू पडतात. स्टॅन्ली म्हणतात, () समाजातील काही घटकांना अमानुष ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणे. () समाजातील काहींना वगळूने इतर लोकांमधील सहानुभावाची क्षमता कमी करणे. त्यामुळे अशा समाजाला दिली जाणारी वागणूक समर्थनीय ठरू लागते. () स्वातंत्र्याची गळचेपी, तुरुंगवासात डांबणे, देशोधडीला लावणे इथून सुरुवात होऊन ती अतिरेकी होत जाऊन विशिष्ट समूहांच्या सरसकट नरसंहारापर्यंतही जाऊ शकते. () वंशसंहार किंवा समाजशुद्धीकरणाच्या मोहिमा सुरू करून नवनवीन मोहिमा राबवल्या जातात. () एखाद्या लोकसमूहालाआम्हीआणितेअशा दोन गटात विभागणी केली जाते. (पान-३९)

वाचा : सावरकरांच्या बढाईकरणाचं सांस्कृतिक षड्यंत्र !

वाचा : महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान

भारतातील फॅसिस्ट संघटना पूर्णपणे अफवातंत्र द्वेशभावाच्या पायावर उभ्या आहेत. खोटे आरोप करणे, अर्धसत्य, काल्पनिक कथा, घृणा, जातीय श्रेष्ठत्व, धार्मिक भेद आणि दुष्प्रचारावर आधारलेल्या या संघटना आपले सर्व कट, कारस्थाने इतरांवर लादतात आणि त्यांच्याविरुद्ध द्वेषाची मोहीम राबवतात. आपण करत असलेल्या दृष्कृत्याला इतरांच्या माथी मारून किंवा त्यांच्यावर तो आरोप करून सदरील कृत्य गंभीर गुन्हा ठरवतात. संघ छावणीचे भाष्यकार, लेखक, संपादक, पत्रकार, प्रसिद्धीमाध्यमे तथा ट्रोलर त्यांच्या कामात त्यांना साथ देतात. मीडिया त्यांच्या निष्ठावंत शाखेसारखा काम करतो. गेल्या १० वर्षांत मीडिया ज्या प्रकारे उजव्या विचारसरणीच्या अजेंड्यावर काम करत आहे, ते पाहता आगामी काळात त्यांची पूर्वाश्रमीची लोकशाही प्रतिमा परत येईल, असं वाटत नाही. ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार म्हणतात त्याप्रमाणे हा गोदी मीडिया लोकशाहीचा हत्याराठरत आहे.

आरएसएसने वेगवेगळ्या मागास समाजघटकात घुसखोरी केलेली आहे. त्यांच्या जाती संघटना, समूह-पंथीय गट अस्तित्वात आणले आहेत. त्यांच्या जननायकाला हिंदू धर्माचा प्रचारक घोषित केलं आहे. आदिवासी, दलित, मागास, ओबीसी वर्गातील समाजनायकांना हिंदू ओळख देऊन भगव्या झेंड्याखाली त्यांच्या अनुयायींना संघटित केलं आहे. समाजातील नाकारलेले, बाजूला पडलेले, त्रस्त झालेले, बदनाम झालेल्या उपेक्षित लोकांना अस्मिता, ओळख खोटी सहानुभूती देऊन संघटित केलं आहे. त्यांना आश्वासने, पदं, सन्मान, प्रतिष्ठा प्रसिद्धी देऊन आपल्या गोटात बंदिस्त केलं आहे.

ही लोक आरएसएसकडून बुद्धिभेद दुष्प्रचाराचं प्रशिक्षण घेतात. त्यानंतर आपल्याच समाजघटकावर टीका-टिप्पणी करू लागतात. समाजघटकावर होत असलेल्या जातीय-धार्मिक अत्याचार, व्यक्तिद्वेषी हिंसा, अन्यायावर गप्प राहतात किंवा त्याचं सामान्यीकरण करण्याचा खटाटोप करू लागतात. त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्रवादाच्या ब्राह्मणी अजेंड्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. त्यात दलित, आदिवासी, ओबीसी इतर मागास समुदायासह शिख, मुस्लिम आणि ख्रिश्चियनसुद्धा आहेत. ही मंडळी हिंदू धर्म, त्यातील जातिभेद, वर्णश्रेष्ठत्वाला राष्ट्रीय गौरव म्हणून मिरवतात. मानवताविरोधी गुन्ह्याचं समर्थन करतात. व्यक्तिगत हिंसेचं पंगू समर्थक होतात. धर्मांधता, दहशत गुंडगिरीला शरण जातात. हिंदू-ब्राह्मणी संस्कृतीला आपली संस्कृती म्हणून सादर करतात. वेगवेगळ्या शोषित समाजघटकात आरएसएसने हिंदू धर्माधारित सांस्कृतिक ओळख मजबूत करण्याचं काम अत्यंत चलाखीने केलेलं आहे. त्यांना संघटित करून दुहेरी फायदा उचलला जातो. एक तर सामाजिक भेद निर्माण करण्याच्या हेतूंना बळ मिळतं. दुसरं म्हणजे त्यांच्या संघटिकरणाच्या आधारे हिंदू मतांचं यशस्वी राजकारण रेटलं जातं. आरएसएसची नजर राज्यघटनेने संरक्षित केलेल्या विधीमंडळ असो वा संसदेच्या राखीव जागांवर असते. या जागेच्या बळावरच सत्तेचा मार्ग अधिक सोप्या पद्धतीने पार करू शकतो, हे त्याला माहीत आहे.

आरक्षित जागांवर आरएसएसच्या विचारसरणीचे लोक निवडून आणण्याच्या प्रयत्नात वेगवेगळे समुदाय, वर्गघटकांत हिंदू राष्ट्रीय म्हणून जातीय भेद वेगवेगळ्या अस्मितेच्या आगीला हवा देण्याचं काम संघ सातत्याने करत असतो. हेच कारण आहे की, अनेक गैरब्राह्मणी घटक आज वेगळ्या राष्ट्राची म्हणजे हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत. अर्थात गोळवलकर, मुंजे सावरकरप्रणीत द्वि-राष्ट्राची मागणी पुन्हा केली जात आहे. या संविधानद्वेषी फुटीर अजेंड्याला पुढे घेऊन जाण्याचं कार्य बहुजन व्यक्ती-पक्ष-संघटना करतात आणि या कामाविषयी ते अभिमान बाळगतात.

वाचा : डावी चळवळ आणि दुर्लक्षित मुस्लिम

वाचा : उजव्या राजकारणात डाव्या पक्षांची अपरिहार्यता

थोडक्यात, आरएसएसविरोधात असलेला हा लढा सांस्कृतिक आहे. त्याचवेळी तो वैचारिकही असला पाहिजे. काँग्रेस नेते राहुल गांधी या लढ्यात निडर होऊन उतरले आहेत. त्यांनी सावरकरांची भेकडता आणि कथित वीरतेची वासलात लावली. त्यामुळे सावरकरांची तथाकथित राष्ट्रीयता आणि राष्ट्रनायकांच्या प्रतीमेला जोरदार आघात पोहोचला. त्यामुळे आज अनेकजण आरएसएसच्या प्रभावातून मुक्त होऊन सावरकरांच्या कथित जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची हिंदुत्वाची उघड चिरफाड करत आहेत

राहुल गांधींच्या सततच्या हल्ल्यामुळे सावरकरांच्या मिथकीय प्रतिमा उद्ध्वस्त झाल्या. अभ्यासक, विचारवंत भाष्यकारांची मांडणी या उद्ध्वस्तीकरणाला पूरक ठरत आहे. अशाच प्रकारे हा वैचारिक लढा पुढे गेला तर आगामी काळात अनेक ब्राह्मणी अर्विभावात रचलेले मिथक नेस्तनाबूद होतील. उजव्या विचारसरणीच्या हिंदू राष्ट्रवादाची पोलखोल होईल. आरएसएसच्या वैचारिक जोखडातून जोपर्यंत सामाजिक-सांस्कृतिक चळवळीची, विचारविश्वाची, संसदीय राजकारणाची सुटका होत नाही, तोपर्यत संघाच्या मानसिक गुलामीतून लोकशाही प्रक्रियेला मुक्तता मिळू शकणार नाही.

आरएसएसचं शीर्ष नेतृत्व म्हणते, “संघ ना कभी बदला हैं, ना कभी बदलेगा. संघ का चारित्र्य बिलकूल वैसा ही है, जैसा पहले के दिनों में था.” अर्थात स्पष्ट आहे की संघाचं कथित परिवर्तन एक मोठा भ्रमजाल आहे. त्यामुळे या विरोधातील सांस्कृतिक संघर्ष गरजेचा होऊन जातो.

आरएसएसच्या ब्राह्मणी वर्चस्ववादी रचनेवर आघात करण्याचं काम उघडपणे तेवढ्याच शांततेने करण्याची गरज आहे. जी लोक हे काम करीत आहेत, त्यांचे हात मजबूत करण्याचीही गरज आहे. श्री. राम पुनियानीदेखील एक अशीच व्यक्ती आहे, जिने फॅसिस्ट विचारसरणीच्या विरोधात उघड मोर्चा उघडला आहे. त्यांनी गेल्या चार-पाच दशकापासून अथकपणे सामाजिक, सांस्कृतिक राजकीय प्रबोधनाचं कार्य सुरू ठेवलं आहे.

सांप्रदायिकतेचा विरोध, सामाजिक सद्भाव, सहजीवन लोकशाही संवर्धनाचं काम पुनियानी अथकपपणे करीत आहेत. त्यांच्या अशा लेखांचं डॉक्युमेंटेशन करावं, असं वाटत होतं. त्याचाच एक भाग म्हणून हे काम पूर्णत्वास नेलं आहे. पुस्तकातील लेख मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकीर्दीतील असून ते वेळोवेळी लिहिलेले आहेत. हे लेखन कार्यकर्ता, अक्षरओळख असलेली व्यक्ती, सामान्य लोकांना लक्षात ठेवून लिहिण्यात आलेली आहेत. त्यातील निवडक लेखांना पुस्तकरुपाने सादर करीत आहोत.

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हे लिखित साहित्य संकलित करणं गरजेचं होतं. सामाजिक द्वेष विखार पसरवणाऱ्या शक्तीना पुन्हा निवडून द्यायचं का? असा प्रश्न उपस्थित करणारे हे पुस्तक आहे. स्वाभाविक सामान्य मतदारांमध्ये जनजागृती होईल, असा त्याचा उद्देश आहे. हे लेखनकार्य समकालीन इतिहास आहे. जेव्हा कधी मोदी सरकारच्या १० वर्षाच्या कार्यकाळाची समीक्षा केली जाईल, तेव्हा या लेखनाला आपोआप महत्त्व येईल. संबंधित पुस्तकाला संदर्भ साहित्य मानलं जाईल.

वाचा : पोलीस अॅक्शनचा वस्तुनिष्ठ इतिहास : दोन मुलूख एक कहाणी

अजून एक उल्लेखनीय बाब अशी की आरएसएसप्रणीत भाजप-मोदी सरकारविरोधात भारतीय जनतेत कमालीचा असंतोष आहे. प्रबळ नाराजी व निराशा आहे. एकीकडे हिंदू राष्ट्रवाद्यांचं विद्वेषी राजकारण तर दुसरीकडे अफाट वाढणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर, अतिरिक्त महागाई, इंधन दरवाढीने जनसामान्य अस्वस्थ आहे. नोकरदार व मध्यमवर्ग आज जरी भाजपच्या द्वेषभावी राजकारणाचा मूकदर्शक असला तरी ही मंडळी त्रस्त आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळे गप्प आहेत. पण मे २०२४, नंतर सत्तांतर झालं तर त्यांच्या मौनाला वाचा फुटेल.. त्यांचा असंतोष बाहेर पडेल.. सामान्य जनतेची अगतिकता, हतबलता, निराशा व राजकीय असंतोष म्हणूनही या बोलक्या आवाजाचं, लेखांचं, भूमिका आणि संघर्षाचं संकलन करत आहे.

अशा अनेकविध कारणामुळे वाटत होतं की, श्री पुनियांनी यांच्या लेखांना मराठी भाषेत आणावं. तसं पाहिलं तर पुनियानी सरांनी गेल्या १० वर्षांत आरएसएसचा सांप्रदायिक अजेंडा, द्वेषाचं राजकारण, दुष्प्रचाराविरोधात असंख्य लेखमाला लिहिली आहेत. पण यात त्यांच्या हिंदुत्वाविषयीच्या ठरावीक लेखाचं संकलन केलं आहे.

डॉ. राम पुनियानी यांच्या लेखनकार्यांला समकालीन इतिहास म्हणून संकलित करणं माझी भूमिका होती. शिवाय त्यांच्या लेखनकार्याबद्दल माझ्याकडून ही कृतज्ञताही आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या डॉक्युमेंटेशनला आपल्यासमोर सादर करीत आहोत. आशा आहे की, वाचक याचं स्वागत करतील. त्याचप्रमाणे आयटक (महाराष्ट्र राज्य कौन्सिल)ने अल्पकाळात पुस्तक प्रकाशित करण्याचं निश्चित केलं, त्याविषयी त्यांचेही आभार.

.....

लेखक : राम पुनियानी

अनुवाद : कलीम अज़ीम

पाने : ९९

किंमत : १०० रुपये

प्रकाशक : आयटक (महाराष्ट्र राज्य कौन्सिल)

वितरक : लोकवाङ्मय गृह, मुंबई

.....

(राम पुनियानी यांच्या आरएसएस आणि वर्तमान राजकारण पुस्तकाच्या भाषांतराची प्रस्तावना)

कलीम अज़ीम, पुणे

१० मार्च २०२४

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,37,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,292,व्यक्ती,17,संकलन,61,समाज,246,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: आरएसएस आणि वर्तमान राजकारण
आरएसएस आणि वर्तमान राजकारण
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjHCicvLVS2UCSJr7yId-mZSyihSOzVdQg-O0JeKmUXGInh4Ji2ULKzxfrRMsNOkDw9okyCgOqr3HhGKbT2R7c13iHc9iVBCA5KgXj89XGBMenTvi6wy6bjvTmtQwA63Aqjx7s4HyKf1n11_qGD0CEO1uChyphenhyphenRISuB7LvbyrsxELzg1vi5TS_T-JJp_uzrSc/w640-h492/rss%20ani%20vartaman%20rajkaran_page-0001.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjHCicvLVS2UCSJr7yId-mZSyihSOzVdQg-O0JeKmUXGInh4Ji2ULKzxfrRMsNOkDw9okyCgOqr3HhGKbT2R7c13iHc9iVBCA5KgXj89XGBMenTvi6wy6bjvTmtQwA63Aqjx7s4HyKf1n11_qGD0CEO1uChyphenhyphenRISuB7LvbyrsxELzg1vi5TS_T-JJp_uzrSc/s72-w640-c-h492/rss%20ani%20vartaman%20rajkaran_page-0001.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/05/blog-post_23.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/05/blog-post_23.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content