‘दादुमियाँ’
हे तसं पाहिलं तर मुस्लिम नाव आहे. पण या नावाने प्रकाशित झालेली
पुस्तकं व लिहिलेली लेख एका कर्मठ हिंदुत्ववादी ब्राह्मणाने लिहिली आहेत. होय हे
खरं आहे. हे लेखक आरएसएसचे सक्रिय प्रचारक व मुस्लिम द्वेषाणू डसलेले गृहस्थ आहेत.
त्याचं खरं नाव ‘दामोदर विष्णू नेने’
असं आहे. सध्या नव्वदीत असलेले नेने बडोद्यात राहतात. मराठीसह इंग्रजी व गुजराती
भाषेत ते सतत मुस्लिमविरोधी लेखन करतात.
दामोदर नेने ‘सोबत’ नावाच्या
पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या पत्रिकेचे नियमित लेखक होते. १९८०नंतर हे पत्र बंद
पडलं, पण नेनेंची ओळख ‘सोबत’शी जोडूनच
राहिली. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या निवडक लेखाचं संग्रह म्हणजे ‘धास्तावलेले मुसलमान’ हे पुस्तक होय. प्रचारकी
धाटणीचं हे पुस्तक मुस्लिमविरोधी विखार, द्वेश, तुच्छता व तिरस्काराने भरलेलं आहे.
पुस्तकाचा एकूण रोख मुस्लिमांची हेरगिरी करणे असा दिसतो. इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की, हेरगिरी शत्रुपक्ष दृष्ट करतो, त्याचा उद्देश नेहमीच दृष्ट असतो. या पुस्तकात ठिकठिकाणी मुस्लिमांच्या उणिवा दाखवून त्यांना उपदेशाचे डोस पाजलेले आहेत. त्यातील बहुतांश लेखन इस्लाम आणि मुस्लिम समाजावर नकारात्मक व तिरस्कृत पद्धतीचं आहे. एरव्हीदेखील हिंदुत्ववादी भाष्यकार किंवा पत्रकार अशाच पद्धतीने लिहितात. त्यामुळे त्यातील आशय वाचून निर्ढावलेल्या वाचकांना नवल वाटणं किंवा राग येत नाही. पण प्रश्न पडतो की, छद्म किंवा बनावट नावाने लिहिण्याची काय गरज? कारण हिंदुत्ववादी अशा प्रकारची द्वेषी लेखन उघडपणे करतात व तेवढ्याच धाडसाने प्रसिद्ध करतात. पण लेखकाचा लेखन काळ व त्यांचा जरासा इतिहास चाळल्यावर मला नेमकं कोडं उलगडलं.
वाचा : मुल्कपरस्त : मुस्लिमांची हेरगिरी करणारा ‘पुरोगामी’ लेखक
रामजन्मभूमी आंदोलनापूर्वी हिंदुत्ववादी विचारांना वाचक, दर्शक व समर्थक मिळत नव्हते. १९८०नंतर देशात दंगलीची लाट आली व मुस्लिमद्वेशी राजकारणाची चलती झाली. हिंदू राष्ट्रवाद्यांच्या विचारांना समर्थक लाभू लागले. तत्पूर्वी हिंदुत्ववादी लेखक, अभ्यासक व भाष्यकार दडून, लपून व टोपण नावाने लिहीत होते. दादूमियाँ हे देखील याच काळाचं अपत्य असावेत.
म्हटलं जातं की, नेनेंना सावकरांनी प्रश्न केला की, बनावट नावाने का लिहितो? त्यावर नेने म्हणाले की, शत्रुच्या गोटात शिरण्यासाठी हे नाव धारण केलं आहे. उत्तराने सावकरांना अत्यानंद झाला व त्यांनी नेनेंची पाठ थोपटली.
नेने पेशाने
डॉक्टर होते. विशेष म्हणजे त्यांचा दवाखाना बडोद्यातील मुस्लिम वस्तीत होता.
स्वाभाविक, त्यांच्या ग्राहकात मोठ्या प्रमाणात मुस्लिम होते. मुस्लिमांत ते
दादूमिया नावाने परिचित होते. हे नावही त्यांनी एका मुस्लिम पेशंटचं चोरलेलं होतं.
पुढे हेच नाव इस्लाम व मुस्लिम समाजावर टीकात्मक लेखन करण्यासाठी त्यांनी लेखक
म्हणून स्वीकारलं.
बनावट नावं धारण करुन नेनेंना काय साध्य करायचं होतं, हे त्यांनी सावरकरांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट होतं. अर्थातच आपल्या विखारी विचारांतून मुसलमानात गोंधळ निर्माण करणे हा त्यांचा खटाटोप होता. त्यातही महत्त्वाचं म्हणजे एक मुस्लिम असा विचार करतो, असं पटवून देऊन मुस्लिमात सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय अधिक्षेप घडवून आणणे असा होता.
पुस्तकातील विविध
लेखातून नेने यांनी ‘दादुमिया’ नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ब्राह्मणी विचारसरणी मराठी
मुसलमानांवर थोपविण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नाही तर संघाच्या कानगोष्टीतून
होणारा सततचा विखारी प्रचार त्यांनी आपल्या शेलक्या भाषेत मांडला आहे.
आज व्हॉटसएपमधून
प्रसारित होणारे हिंदूवादी विखार वाचल्यास नेने या मेसेजचे निर्माता व कर्ता आहेत, असं सहज
कळतं. म्हणजेच नेने संघात शिकवल्या किंवा तेथील बौद्धिकात मांडल्या जाणाऱ्या
मुलिमविरोधी विचारांचे जनक वाटतात. ‘सोबत’चं सामूहिक वाचन संघाच्या शाखेत होत असे. त्यामुळे
असं म्हणता येईल की, आज विखार पेरणारी पिढी दादुमियाँ वाचून तयार झालेली आहे.
भारतीय मुस्लिमांच्या कुठल्या अनामिक भितीने नेने ग्रासले होते की, त्यांना मुस्लिम नाव धारण करून लिहावसं वाटलं. त्यांच्या लेखनातून त्यांनी मुस्लिमांची धास्ती घेतलेली मात्र नक्की जाणवते.
नेनेंनी केलेलं
सबंध लेखन सार्वजनिक चर्चाविश्वात आहेत. त्याविषयी पुन्हा उजळणी करण्याची गरज
नाही. परंतु मुसलमान नावाने लिहिलेले लेख एक मुस्लिम सांगतोय, बोलतोय, लिहितोय अशा
धाटणीचे आहेत. स्वाभाविक त्यांनी इस्लामवर केलेलं लेखन पूर्वग्रहदूषित तर होतेच,
त्याचबरोबर इस्लाममध्ये घुसळण निर्माण करणारेही आहेत. भारतीय मुस्लिमांची दिशाभूल
करावी, या हेतूने त्यांनी मुस्लिम नाव धारण करून लिहिलेले आहे.
दामोदर नेनेंचे
सर्वच लेख पाहता नाही आले, परंतु संबंधित पुस्तक व सोबतच्या समग्र खंडात काही लेख
जरूर पाहिले आहेत. त्यात त्यांनी घेतलेली भूमिका एखाद्या कर्मठ मुस्लिमांची कडवी प्रतिमा निर्मिती करणारी आहे. मुस्लिमांना आक्रमक, अविचारी, हिंसक व धर्मांध ठरविण्यासाठी
नियोजनबद्ध लेखन केलेलं दिसतं. शिवाय या छद्म नावाने ते सार्वजनिक क्षेत्रात वावरले.
त्यामुळे वेळेप्रसंगी त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात सनातनी भूमिका घेतली असावी, प्रतिक्रिया दिली असावी,
यात कुठलीच शंका नाही.
वाचा : मुसलमानांचे राजकीय व सांस्कृतिक आत्मभान
वाचा : आरएसएस आणि वर्तमान राजकारण
वर्तमान स्थितीत ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’ नावाने संघाची मुस्लिम विंग सक्रिय आहे. त्यात मुस्लिम नावाचे व्यक्ती
मुसलमानांना उपदेशाचे डोस पाजतात. त्यांना मुख्य प्रवाहात येण्याविषयी सल्ले
देतात. ते हिंदू धर्माचे पुरस्कर्ते आहेत. रामायण-महाभारताचे प्रचारक आहेत. त्यांना भारतीय मुसलमानात व पर्यायाने इस्लाममध्ये काहीच चांगले दिसत नाहीत. ते आरएसएसमधील वरीष्ठाच्या आदेशाचं निष्ठापूर्वक पालन करत इस्लामविरोधी बोलत राहतात. कुरआनवर आक्षेप नोंदवतात. ही मंडळी वैदिक धर्माचे संरक्षक आहे. देवी-देवतांच्या फोटोसमोर उभे राहून
आरत्या करतात. बुरखाधारी महिला हनुमान चालिसा म्हणतात. मुसलमानांना राष्ट्रीय
होण्याचे सल्ले देतात. मुसलमानांवर यथेच्छ टीका करतात.
आज सोशल मीडियावर
मुस्लिम नावं असलेल्या असंख्य बॉट (फेक) प्रोफाइल आहेत. त्यांचा वापर इस्लाम व
मुस्लिमांचे चित्र आक्रमक व अधिकाधिक हिंसक सिद्ध करण्यासाठी केला जातो. हिंदू
धर्मावर टीका करण्यासाठी तर बहुतांश वेळा इस्लाममध्ये हस्तक्षेप घडवून आणण्यासाठी
त्याचा वापर होतो. दामोदर नेने देखील असेच जीवंत चालते-फिरते बॉट आहेत. मुस्लिमांची
हेरगिरी करणारा एक छद्म व्यक्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे.
२०१८ साली ‘मटा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत नेने यांनी बनावट नाव धारण करण्याचं योग्य कारण सांगितलं. म्हणतात,
“मुस्लिमबहुल भागात प्रॅक्टिस असल्याने अनेक रुग्ण मुस्लिम असत. माझा कुरआनवर अभ्यास असल्याने मी त्या विषयी लिहायचो, पण नेने नावाने कोण वाचणार, ही शंका आली. माझ्या एका रुग्णाचे नाव दादूमिया होते. त्याच नावाने मी लेखन सुरू केले.”
नेने ब्राह्मण
म्हणून कोण वाचणार, त्यामुळे मुस्लिम नाव धारण केलं. या गौप्यस्फोटात त्याचा हेतू
स्पष्ट झालेला आहे. दादूमियाँ नावाने त्यांनी मुस्लिमांची हेरगिरी केली. दृष्ट हेतू
ठेवून मुस्लिम म्हणून वावरले. त्यांनी आपल्या लेखनात ठिकठिकाणी भाजप-संघाला
अभिप्रेत असलेला ‘गुड मुस्लिम’च मांडला आहे. त्यांच्या दृष्टीने मुस्लिम हा हिंदुत्वनिष्ठ व वैदिक
परंपरेला मानणारा असावा. मुंजे-गोळवलकरांना अपेक्षित असलेला दुय्यम नागरिक मुस्लिम
त्यांना हवा आहे.
नेने मुस्लिमांची
विकृत प्रतिमा सादर करतात. त्याला धर्मांध, अविश्वासी म्हणतात. मुसलमानांकडे त्यांचा
पाहण्याचा दृष्टिकोन ब्राह्मणी आहे. बजरंग दल किंवा त्यांच्या हिंसक संघी
हल्ल्यासारखे मुस्लिमांवर शरसंधान साधतात. त्यांच्या लेखनात अनेक पूर्वग्रह दिसून
येतात. त्यांनी मुसलमानांविरोधात खोटी मिथकं, संघीय प्रचार व ब्राह्मण्यवादी प्रपोगंडा वापरला आहे. असो. पुस्तकाचा एकूण
सारांश पुढील दोन शब्दात मांडता येईल, तो म्हणजे भेदनिती व बुद्धिभेद..!
‘धास्तावलेले
मुसलमान’ पुस्तकावर दादुमियाँऐवजी दामोदर नेने असं लिहिलं
असतं तर फारसा काही फरक पडला नसता. नेने पुस्तकात केवळ मुसलमानांनाच नाही तर सर्वच
गैर-ब्राह्मण्यांना झोडपतात. त्यांच्या अजेंड्यावर केवळ मुस्लिम नाही तर दलित
समुदायही आहे. ‘सोबत समग्र’ खंडातील
नेनेंचे लेख वाचल्यास स्पष्ट होतं की, त्यांनी वेळोवेळी दलित समाज व आंबेडकरी
चळवळीवरही विकृत पद्धतीने टीका केलेली आहे.
सदरील पुस्तकाच्या
मनोगतात दामोदर नेनेंनी भेदनितीला राजधर्म म्हटलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हेतू
साध्य करण्यासाठी भेदनितीची वापर करावा लागतो, असं ते सांगतात. मोदींसारखं राजकीय
हित साध्य करण्यासाठी भेदनिती एक साधन ठरू शकतं असं त्याचं म्हणणं आहे.
वाचा : नागरिकता विधेयक म्हणजे नव्या धोक्याची चाहूल
‘धास्तावलेले
मुसलमान’ हे मुळ पुस्तक २६० पानांचे आहे. पण १०० पानांचे परिशिष्ट
त्याला जोडलेली आहेत. ही परिशिष्ट हिंदुत्ववाद्यांचा नवनवीन प्रपोगंडा व संघाच्या
मिथकीय अजेंड्यावर आहेत. शेवटची १०० पानं पाहून सुज्ञ वाचकांना प्रश्न पडतो की
पुस्तक निरर्थक का फुगवलंय? परंतु खरी मेख इथंच आहे. या जोड
पानांत वेळोवेळी मांडण्यात आलेला संघीय प्रचार कोंबला आहे. अगदी मोदी कार्यकालातील
मुस्लिमद्वेशी प्रचारही!
शेवटच्या
परिशिष्टात २०१८ला घडलेल्या केरळच्या कथित ‘लव्ह जिहाद’ टाकला आहे. टिपणातून हे प्रकरण सत्य
असल्याचा भास तयार केला आहे. मुळात प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तो पुस्तकात घेणे
अयोग्य होतं. हे करीत असताना वेळेप्रसंगी त्याची पूर्वसूचना वाचकांना देणं गरजेचं
होतं. पण अशी कुठलीही प्रथा पाळण्यात आलेली नाही.
वास्तविक, त्याच
वर्षी २०१८ला अखिला अशोकन उर्फ हादिया व तिचा पती शफ़ीन जहानच्या लग्नाला सर्वोच्च
न्यायालयाने मान्यता दिली होती. म्हणजेच हिंदुत्ववाद्यांच्या फुग्यातील हवा
कोर्टाने काढून टाकली. केंद्रातील प्रशासकीय दबावामुळे हे प्रकरण एनआयएकडे वर्ग
करण्यात आलं. सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी झाली. कोर्टाने अत्यंत शेलक्या
शब्दात एजन्सीजला धारेवर धरलं.
त्यामुळे २०१९ला
एनआयएला आपला तपास संपवताना म्हणावं लागलं, “यात लव्ह जिहादसारखं कुठलीच बाब नाही.”
दोन दिवसापूर्वी ४ फेब्रुवारी २०२०ला भारतीय संसदेनेही स्पष्ट केलं
आहे की केरळचं प्रकरण बनावट होतं. केंद्रीय गृह राज्य मंत्री किशन रेड्डी यांनी
लोकसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं होतं, केरळ उच्च न्यायालयासह अनेक
न्यायालयांनी या मिथकाला खोटं ठरवलं आहे. ते
म्हणाले, “लव जिहाद शब्द मौजूदा कानूनों के तहत परिभाषित
नहीं है। लव जिहाद का कोई मामला केंद्रीय एजेंसियों के संज्ञान में नहीं आया है।” पुढे ते म्हणतात, “संविधान का अनुच्छेद किसी भी धर्म को स्वीकारने, उस
पर अमल करने और उसका प्रचार-प्रसार करने की आजादी देता है।”
म्हणजेच केरळचं कल्पित
लव्ह जिहाद प्रकरण खोटं होतं, हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे ते एकदाचं संपलं आहे.
संघीय मंडळी नेहमीच खोटा व दिशाभूल करणारा प्रचार करून जनमानस बिघडवित असतात.
त्याविषयी वेळोवेळी उघडं पाडणारे लेखन होतं असतं. बोललं जातं. तरीही ही मंडळी
जाणून बुजून अशा कुरघोड्या सतत करीत असते.
हादिया प्रकरण
सरकार व न्यायंत्रणेने खोटे ठरवलं. पण नेने सारखे विखारी प्रचारक मात्र येणारी १००
वर्ष तो लव्ह जिहादच होता असंच म्हणतील. मराठी वाचकही त्यांच्या लेखनाला खरं
समजतील. तिरस्काराने भारावलेले हे संघी लेखक मंडळी कुठल्याही वादग्रस्त घटनेतील
नवी घडामोड नोंदवत नाहीत. त्याची दखल घेत नाही. किंवा त्याविषयी केलेलं लेखन वगळत
नाही. वाचकही निर्बुद्धपणे या अर्धसत्याला खरं मानू लागतात व त्यांची वकिली करतात.
दादुमियाँ उर्फ दामोदर नेने यांच्यासारख्या लेखकांनी वर्षानुवर्षे मराठी वाचकांचा
विश्वासघात केला व त्यांची दिशाभूल केली आहे. अशा रीतीने सतत बुद्धिभेद निर्माण करणारी
अर्धसत्य माहिती प्रसारित करणं त्याचं कार्य राहिलेलं आहे.
वाचा :उजव्या राजकारणात डाव्या पक्षांची अपरिहार्यता
वाचा : शपथविधी झाला अन् रोजगार घटले
खूप कमी वाचकांना
दामोदर नेने उर्फ दादुमिया यांचं खरं नाव माहीत असेल. हे अजाण वाचक त्यांना मुसलमान
समजून बघा, एका मुसलमानाने हे लिहून ठेवलं आहे, म्हणतील. हादिया अफवा खरी मानून
इतरांसारखे तेही मुसलमानांच दोषी ठरवतील. कोणीही वाचक त्यातील सत्यता शोधण्याची
तसदी घेणार नाही.
वास्तविक, मराठीत मुसलमानांबद्दल लिहिलेलं
लिखाण व पुस्तके अशाच पद्धतीने दुष्प्रचारी, एकांगी मतावर
आधारित मिथकांचे खोटे कुंभाड आहेत. मराठीतील बिगरमुस्लिम लेखकांनी लिहिलेलं बरचसं
लेखन मुस्लिमद्वेषी आहे. मिथकीय साधनांचा आधार घेऊन ती रचली गेलेली आहेत.
वृत्तपत्रीय लेख असो वा इतर लेखनात मुस्लिमद्वेषाचा गंध सतत येत असतो.
नरहर कुरुंदकर सारखे लेखक सुप्त पद्धतीने मुस्लिमविरोधी लेखन करतात. अनेकदा वाटतं की, त्याचं लेखन हिंदुत्ववाद्यांना झोपडणारे आहे, परंतु बारकाईने वाचल्यास अंतिमत: ते मुस्लिमविरोधी सिद्ध होतं. कुरुंदकरांसारखे अनेक लेखक आहेत, त्यांचं लेखन वाचून त्याची नेमकी भूमिका स्पष्ट होत नाही. यदूनाथ थत्ते यांनी मुल्कपरस्त नावाने असाच प्रकारचे मुस्लिम विरोधी, टीकात्मक लेखन केलेले आहे. विशेष म्हणजे दादूमियाँ व मुल्कपरस्त एकाच कालावधीत लिहित होते व प्रकाशित करीत होते. कुरुंदकर व थत्ते यांचं लेखन पाहिल्यास दादुमियाँ सारखे मुखवटे धारण करणारे आसपास अनेक आहेत, हे सहज दिसून येईल.
मुजफ्फर हुसैन
हेदेखील मुस्लिम विषयावर मराठीत लिहिणारे एक लेखक होते. वास्तविक, ते नावाने
मुस्लिम पण कर्माने हिदुत्ववादी होते. आरएसएसच्या नियमित शाखेत जाणारे होते. ‘तरुण भारत’, ‘सामना’चे ते नियमित
स्तंभकार होते. त्यांचं प्रत्येक लेखन, विचार, भाषणं व कृती मुस्लिमविरोधी होती.
अनेकदा वाटायचं की ज्या पद्धतीने संघाने कुलकर्णी, दामले इत्यादींचे नाव बदलून
बहुजन नावं धारण केली, त्याप्रमाणे मुजफ्फर हुसैन हेदेखील नाव बदलून घेतलं असावं,
असं वाटतं. त्यांचं २०१८ला निधन झालं.
आरएसएस हुसैन यांना पुढे करत गुड मुस्लिम कसा असावा, असा उपदेश करीत होता. अनेकांना हे माहीत नव्हते की, हुसैन नावाचे हे लेखक संघाचे प्रचारक आहेत. त्यामुळे दुर्दैवाने म्हणावं लागतं की, मुस्लिम नावाने किंवा बिगरमुस्लिमांनी लिहिलेलं कुठलंही टीकात्मक मुस्लिमविषयक लेखन वाचण्यापूर्वी लेखकाची पार्श्वभूमी तपासून बघावी लागते. अशा प्रकारचा कुठलाही मजकूर वाचण्या-पाहण्याआधी त्याचा लेखक तपासावा, त्याची जन्मकुंडली काढावी.
कलीम अज़ीम, पुणे
६ फेब्रुवारी २०२०
मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com