सीमा वाद आणि कोरोना संकटात नेपाळ

नेपाळ सध्या तिहेरी संकटाचा सामना करत आहे. कोरोना वायरसने देशात अस्वस्थता माजवली असताना चीनने हद्दीत घुसखोरी केली आहे. त्यात विरोधक व सत्ताधारी पक्षातील नेत्याकडून सरकार पाडण्याचा कट रचला जातोय. शिवाय भारतासोबत सुरू असलेला सीमा वाद संकटात नव्याने भर टाकत आहे.
कोरोना वायरस रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत जनता आक्रोष करत आहे. साठेबाजी, महागाई आणि बेरोजगारी सारखे प्रश्नही आहेत. या सर्वांकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची नेपाळी राष्ट्रवाद मांडण्याची धडपड सुरू आहे. या सर्वांचा परिणाम देशात राजकीय अस्थितरता व आरोग्य संकट उभे राहण्यात झाले आहे.
अशा परिस्थितीत नेपाळने भारताविरोधात भूमिका घेणे स्थानिक जनतेला अमान्य आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार भारतात आश्रयाला असलेले व काम करणारे नेपाळी बदलत्या घटनाक्रमामुळे अस्वस्थ झालेले आहेत.
गेल्या आठवड्यात नेपाळ सरकारने पुन्हा एकदा कोरोनासाठी भारताला जबाबदार ठरवले. दोन आठवड्यापूर्वी पंतप्रधान ओली यांनी संसदेत जाहीर केले होते की, “बाहेरून (भारतातून) येणाऱ्या घुसखोरामुळे कोविड-19 रोगराईला रोखणे अवघड होत आहे. नेपाळचा आरोप आहे की85 टक्के कोरोना पेशंट भारतातून आले आहेत.
काठमांडू पोस्ट म्हणणे आहे की, “भारतातून अवैधरित्या येणारी लोक देशात ह्या वायरसला पसरवत आहेत. स्थानीय लोक व पार्टी नेते तपासणीशिवाय भारतीय लोकांना सीमेपलीकडे आणत आहेत.
वर्ल्डोमिटरच्या आकडेवारीनुसार नेपाळमध्ये 12 हजार कोरोनाबाधित असून त्यातील तीन हजार रिकवर झाले आहेत. तर 28 जणांचा मृत्यु झाला. नेपाळ हेल्थ मिनिस्ट्रीच्या मते 77 जिल्हे कोरोना संक्रमित झाले आहेत. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात 27 जून या एकाच दिवशी तब्बल 463 नवी प्रकरणे समोर आली.
वाचा : अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट
तरुणांचा उद्रेक
नेपाळमध्ये सध्या देशव्यापी लॉकडाऊन आहे. तरीही कोरोना पेशंटचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जनतेने कोरोना संक्रमणासाठी जबाबदार ठरवले आहे. त्याविरोधात 10 जूनला तरुणांनी रस्त्यावर उतरून भलेमोठे आंदोलन केले. पहिल्या दिवशी सोनौली बार्डर जवळील रुपन्देहीभैरहवा सारख्या अनेक ठिकाणी युवकांनी प्रदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा भडका इतर भागातही उडाला. राजधानी काठमांडूमध्ये अशाच प्रकारचे मोठे आंदोलन उभे राहिले. शिवाय पोखरा आणि चितवनसारख्या भागातही तरुणांचा मोठा जमाव सरकारविरोधात रस्त्यावर होता.
सरकारचा निष्काळजीपणासर्जिकल वस्तुंच्या खरेदीत अनियमितता तसेच विदेशी मदत निधीत फेरफार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
विशेष म्हणजे हे तरुण कुठल्याही राजकीय पक्षाच्या बॅनरखाली संघटित झाले नव्हते. फिजिकल डिस्टन्सिगचे पालन करत हजारो तरुण सरकारविरोधात एकवटले. काठमांडू पोस्टच्या मतेतरुणांच्या हातात विरोध व निषेधाचे फलक होते. महामार्ग व रस्त्याच्या मध्यभागी तरुण-तरुणींचे लोंढे बैठका मारून कितीतरी तास बसले होते.
हे आंदोलन सलग तीन दिवस सुरू होते. पोलिसांनी आंदोलकांविरोधात बळाचा वापर केला. पण ते बंद होण्याऐवजी वाढतच गेले आणि एका विशाल विरोध प्रदर्शनात त्याचे रुपांतर झाले. आंदोलनात लॉकडाऊनच्या काळात भारतातून नेपाळला गेलेल्या युवकांची संख्यादेखील लक्षणीय होती.
भारतीय मीडिया म्हणते कीराष्ट्रीय भावनेला पुढे करून सरकार जनतेच्या हिताशी खेळत आहेअसा आरोप आंदोलकांनी केला. कोरोना नियंत्रणाच्या नावाखाली तीन महिन्यांपासून घरात कोंडले आहोतअशावेळी नागरिकांनाच दोषी ठरवणे चुकीचे आहेअसे तरुणांचे म्हणणे होते.

राष्ट्रभावनांचा वापर
नेपाळी युवकांचा आरोप आहे की, सरकारने देशहिताचा मुद्दा पुढे करून नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे. पंतप्रधान ओली म्हणतातकित्येक वर्षांपासून रखडत असलेला भारतासोबतचा सीमा वाद निर्णायक टप्प्यावर आहे. संवादातून तो सुटू शकतो. त्यांनी देशाचा नवा नकाशा तयार करून संसदेकडून मंजूर करून घेतला आहे. ज्यात भारताने आपला भूप्रदेश असल्याचा दावा केलेला लिपुलेखलिम्पियाधुरा आणि कालापानी या भागात रस्ता तयार करून नेपाळने आपला भाग म्हणून जाहिर केले.
शिवाय 395 किलोमीटरच्या जागेवर आपला हक्का सांगितला आहे. दुसरीकडे नेपाळने भारतीयांसाठी नवा नागरी कायदा लागू केला आहे. तसेच हिंदी भाषेवर बंदी आणण्याची तयारी केली आहे. इतकेच नाही तर यातून उदभवणाऱ्या वादाला सामोरे जाण्याची तयारीदेखील ओली सरकारने केली आहे.
या घटनेवरून नेपाळमध्ये दोन गट पडले आहेत. एकाचे म्हणणे आहे कीसरकारचा निर्णय योग्य आहे. तर दुसरा गट सरकारने उगाच वाद उत्पन्न करू नयेया मताचा आहे. सत्ताधारी गटातील ओलीविरोधक व विरोधी पक्षाचा आरोप आहे की राष्ट्रवादाच्या नावावर जनतेला वेठीस धरले जात आहे. 
भारत-चीन-नेपाळ सीमा वादामुळे आंतराराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय झाला आहे. भारतात विरोधकांनी आक्षेप नोंदवत भाजपा सरकारने ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे.
तिकडे नेपाळी जनता व विरोधी पक्षातील नेते ओली चीनच्या इशाऱ्यावर वागत आहेअसा आरोप करत आहे. नेपाळ हा गरीब देश भौगोलिक क्षेत्र व जीडीपी कमी आहे. बहुतेक वस्तु व सेवांसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. दळणवळणसंचार साधने भारत नेपाळला पुरवतो. शिवाय भूसीमेवरून दोन्ही देशात जाण्या-येण्यासाठी पासपोर्टाची सूट आहे.

सत्ताधारी गटात दुफळी
सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले तर दुसरीकडे चीनबद्दलच्या धोरणावर पंतप्रधान ओली यांचा राजीनामा मागितला आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे कीत्यांचा चीनसोबत कुठलाही सीमा वाद नाही. मात्र कृषि मंत्रालयाचा एक रिपोर्ट सांगतो की 10 जागांवर चीनने ताबा केला आहे. नेपाळी कांग्रेसने एक प्रस्ताव देत जमीन परत मिळवण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे देशाहिताचा मुद्दा पुढे करून 1815 पासून असलेल्या गोरखा रायफल्सला भारतीय लष्करातून परत बोलवावे अशी मागणी सत्ताधारी गटातून केली जात आहे. नेपाळ एक स्वतंत्र देश असून त्याचे सैन्य़ इतर देशांविरोधात वापरता येणार नाहीअशी त्यांची भूमिका आहे. तरुणांनी भारतीय लष्करात सामील होऊ नयेअसे आवाहनही करण्यात आले आहे.
भारत-चीन मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षात दोन गट पडले आहेत. माजी पंतप्रधान पुष्प कमल यांनी पक्षशिस्तीविरोधात गेल्याचा आरोप ओलीवर केला आहे. पक्षाच्या दोन माजी पंतप्रधानासह अनेक खासदारांनी विरोधी सूर काढत ओलींनी खुर्चीवरून पायउतार व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
ओलींनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण ते म्हणतात, अशा संकटाच्या परिस्थितीत ते शक्य नाही. त्य़ानी भारतात आपले सरकार उलथवून टाकण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला आह. एकूणात काय तर नेपाळ सरकार व देश सीमा वादामुळे अस्थिर झाला आहे. शिवाय त्यात कोरोनाची भर त्यामुळे तिथली जनता चिंताग्रस्त आहे. नेपाळसारख्या छोट्या देशाला युद्ध व बेबनाव परवडणार नसल्याची त्यांची भूमिका रास्त आहे. पण सरकार मतांच्या राजकारणासाठी हट्ट धरून आहे. त्यामुळे भविष्यात कोणती स्थिती उदभवेल, हे तुर्तास तरी सांगता येणार नाही.
कलीम अजीम, पुणे

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: सीमा वाद आणि कोरोना संकटात नेपाळ
सीमा वाद आणि कोरोना संकटात नेपाळ
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsuksNUCzDVN1r71cs0m968IagyZJcoErUD6vNXXAbj5O64zx3CXJEef6Y1Vk6EtmnI6htUuEOmicIvAmT6Y8ycT9biRYPY3pYPnW62cXQkEqavfImvYXraAV7s4iMT-GXo-W2LFZuei8i/s640/1593682025477014-0.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsuksNUCzDVN1r71cs0m968IagyZJcoErUD6vNXXAbj5O64zx3CXJEef6Y1Vk6EtmnI6htUuEOmicIvAmT6Y8ycT9biRYPY3pYPnW62cXQkEqavfImvYXraAV7s4iMT-GXo-W2LFZuei8i/s72-c/1593682025477014-0.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content