उत्तर दिल्लीच्या जहांगीर पुरी भागातील रहिमा बेगमचं घर २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी पाडलं गेलं. तिच्या दु:खद आर्त किंकाळीने अनेकांची संवेदनशील मने तडफडणं स्वाभाविक होतं. दुसरीकडे ही विदारकता पाहून अनेकांना आनंद झाल्याचं वास्तवही समोर आलं. अशी ही विकृत, रानटी जमात रहिमाच्या उद्ध्वस्तीकरणावर दात काढून हसत होती.
रमजान ईदपूर्वी रहिमाचं राहत
घरं बुलडोजर लावून पाडण्यात आलं. गेली १५ वर्षें तिनं हे घर उभं करण्यासाठी अनंत
संघर्ष केला होता. सामान्य माणसं आपला निवारा उभा करताना अनेक स्वप्ने-इच्छांना
तिलांजली देतात. तशा रहिमानेही दिल्या असाव्यात.
बुधवारी रहिमाचं घर अचानक अनाधिकृत झालं आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची
अवमानना करत ते क्षणार्धात पाडलं गेलं. काही सेंकदात तिचा संसार रस्त्यावर आला. या
अमानवी कारवाईत तिचं दुकान नष्ट झालं. विक्रीसाठी ठेवलेल्या लहान मुलांची चॉकलेट,
बिस्किटे रस्त्यावर पडून चेंदामेंदा झाली. त्या विस्टकलेल्या व निकामी झालेल्या
वस्तुतून रहिमाचं मूल विखुरलेलं चिल्लर जमा करतानाचा फोटो पाहून काळजाला भेगा
पडणे, साहजिक होतं.
डोळ्यात पाणी घेऊन माझं घर अधिकृत आहे म्हणत, रहिमा कारवाई रोखत होती. सतत बुलडोजरसमोर येऊन उभी राहत होती. परंतु तिला बाजूला ढकलून तिचा संसार उद्ध्वस्त केला गेला. तिच्या किंकाळ्या, याचना, वेदना व दु:खांनी अधिकाऱ्यांचं मन हेलावलं नाही. किती निगरघट्ठ असावीत ही टोळी! त्यांच्या माणूसपणावर संशय यावा, असं हे कृत्य संबंध देश-जगाने पाहिलं.
वाचा : राज ठाकरेंचं भाषण : शंका-कुशंकांना जागा देण्यापूर्वी सावध व्हा!उघड पक्षपात
नरेंद्र मोदी सत्ताप्रणित धर्मांध भारतात मुसलमानांशी कसा व्यवहार केला जातोय, त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. राजस्थानच्या करौली व मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये झालेला अमानवी प्रकार पाहून वाटतं की हा माझाच लोकशाही भारत आहे ना! जिथं केवळ धर्म वेगळा ठरवून माणसाला मानव म्हणून वागणूक नाकारली जात आहे. जगणे लाथाडून मुसलमानांना किड्या-मुंग्यासारखं चिरडून टाकलं जात आहे.
सीएए प्रकरणानंतर मुसलमानाविरोधात अशा प्रकारचे अमानूष, नृशंस अत्याचार व उघड पक्षपातीपणाचे प्रकार वाढले. एका पीडितेने म्हटल्याप्रमाणे नागरिकता विधेयक आंदोलनानंतर पोलीस त्यांना सतत त्रास देत होते. त्याचाच एक भाग म्हणून तिच्या दोन अल्पवयीन मुलांवर दगडफेकीचा आरोप ठेवून तुरुंगात टाकलं आहे.
जहांगीर पुरी प्रकरणात एकूण २२ मुस्लिम तरुणांवर कारवाई झाली. टीकेनंतर एका भगव्या गुंडाविरोधात गुन्हा नोंदवला गेला. परंतु वरच्या दबावामुळे तो लगेच काढलाही गेला. वास्तविक इथं फिर्यादीच
आरोपी होता, हे उघड आहे. तरीही भगव्या टोळीतील एकालाही साधं ताब्यात घेतलं नाही.
कसं घेणार! कारवाई करू पाहणाऱ्या पोलिसांना विहिंपच्या गुंडांनी धमकी दिली होती, “आमच्यावर कारवाई केली तर पश्चाताप भोगावा लागेल.” शिवाय ‘वरून’ तशा ऑर्डरही आलेल्या नव्हत्या.
दोषींवर गुन्हेगारीचा ठपका ठेवणे व चोर सोडून संन्याशाला फाशी देणे हे मोदींच्या राज्यात नवं नाही. किंबहुना मुसलमानांशी ‘असा’ सक्तीचा व्यवहार केला जावा, अशा प्रकारची जणू तोंडी ऑर्डरच काढली असावी. त्यामुळे एकाच पॅटर्नखाली भाजपशासित राज्यात मुसलमानांना न्यायापर्यंत पोहचू दिलं जात नाही. त्यांना न्याय मिळताच कामा नये, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
CAA, NRC आणि NPR प्रकरणात उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वाचा भगवा धारण केलेले मुख्यमंत्री आदित्यनाथांनी आंदोलन करणाऱ्या अनेक मुस्लिम तरुणांच्या घरं-दारांवर जब्तीची टाच आणली. घटनादत्त हक्कांची पायमल्ली करत मुसलमानांना केंद्र सरकारच्या जुलूमी कायद्याविरोधात सत्याग्रह, सभा, निदर्शने, आंदोलन करण्यापासून रोखलं गेलं.
तरुण, वृद्ध, लहान मुलं, महिलांवर पोलिसांनी अमानूष गोळीबार केला. ब्रिटिशांना लाजवेल अशी ही क्रूरता होती. घटनात्मक हक्कांसाठी लढा देणाऱ्या तब्बल २५ मुस्लिम तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर अशाच प्रकारचा पॅटर्न अनेक ठिकाणी राबविला गेला.
पीडित मुसलमानांना दोषी ठरवून त्यांना गुन्हेगार
घोषित केलं गेलं. त्यांच्याविरोधात शत्रूकरणाची प्रक्रिया राबवत त्यांचा मीडिया
ट्रायल केला गेला. पाकिस्तानी, देशद्रोही ठरवून त्यांच्यावर खटले दाखल केले. जेएनयू-जामिया
विद्यापीठातील सत्याग्रह करणाऱ्या विद्यार्थ्यांना अमानूषपणे मारहाण करण्यात आली. ‘शाहीन बाग’मध्ये सत्याग्रह करणाऱ्या वृद्ध
महिलांना वेश्या म्हणून बदनाम केलं गेलं. तरुण मुलींवर पाळत ठेवून
त्यांच्यावर लक्ष्यकेंद्री हल्ले झाले. पत्रकार तरुणींना बलात्काराच्या
धमक्या दिल्या.
भाजपच्या कपील मिश्रा आणि अनुराग ठाकूर यांनी ‘गोली मारो’ सारखी प्रक्षोभक भाषणे करून बहुसंख्याक हिंदूना मुस्लिमांच्या विरोधात हल्ले करण्याच्या सूचना केल्या. गोदी मीडियाने त्यात भर टाकली व दिल्लीत मोठी दंगल झाली.
वाचा : काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर
वाचा :आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!
वाचा : मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे?'
दंगल घडवून सूड
मोदी सरकारच्या काळात मुस्लिमाविरोधात जनसमान्यांना चेतवणे हे काही आता नवं राहिलं नाही. ज्या राजकीय पक्षाचे मुख्य सूत्र मुस्लिमांचा नाश असा आहे, त्याकडून इतर अपेक्षा करणे चुकीचं आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून भारत फुटपाड्या राजकारणाला सामोरं जात आहे. घटनात्मक पद बहाल असलेली मंडळी हिंदूंना मुस्लिमाविरोधात पेटून उठण्याची घोषणाबाजी करतात. त्यामुळे देशभरात मुस्लिमांविरोधात हेट क्राइमच्या घटना वाढीस लागल्या आहेत. दिल्ली हेट क्राइमची प्रयोगशाळा झाली म्हणून पुढे येत आहे.
रामनवमीच्या निमित्ताने दंगली पेटवण्याचं कारस्थान गेली सात-आठ वर्षे सुरू आहे. २०१९ साली अगदी सार्वत्रिक निवडणूकीच्या वातावरणात दिल्लीत हिंदू संघटनांकडून ‘अब की बार हिंदू सरकार’ सारख्या मुस्लिमविरोधी घोषणाबाजी केल्या जात होत्या. केरव्हान मासिकाने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टमध्ये ४९ वर्षीय सय्यद मुहंमद असलम म्हणतात, “पिछले दो सालों से वीएचपी और उसकी युवा शाखा बजरंग दल के लोग स्थानीय मस्जिद, शैखान, के बाहर नारेबाजी करने लगे हैं. उनके अनुसार इस साल यह जुलूस मस्जिद के सामने रुक कर नारे लगा रहा था, “भगवा लहराएगा, टोपी वालों का सर झुक जाएगा.”
अशा प्रकारच्या धार्मिक मिरवणुकीचा उद्देश जनसामान्याच्या धर्मधावनांना आग देणे, असा दिसून आलेला आहे. सीएए प्रकरणात तर हे उघडपणे दिसून आलं होतं. मुस्लिमविरोधी दंगल घडवून ‘शाहिन बाग’ सत्याग्रहाचा सूड उगवला गेला. त्यासाठी परराज्यातून गुंडांची कुमक आयात केली गेली. वेचून-वेचून अनेक मुस्लिमांची घरे-दुकाने जाळून नष्ट करण्यात आली. घरात घुसून अनेकांच्या नृशंसपणे हत्या करण्यात आल्या.
दिल्ली
मायनॉरिटी कमिशनचा रिपोर्ट सांगतो, या दंगलीत तब्बल ५३ जणांची हत्या झाली. प्रतिकारातून
झालेल्या संरक्षण हल्ल्यात मुसलमानांना दोषी ठरवलं गेलं. शिवाय नागरिकता विधेयकाचा विरोध करणाऱ्या अनेक मुस्लिम-गैरमुस्लिम कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकलं. असे अनेक
तरुण गेल्या २ वर्षांपासून तुरुंगात खितपत पडली आहेत. त्यांना जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
केली जातेय.
मात्र, त्याचवेळी मुस्लिम महिलांचा लैंगिक छळाचा बाजार
मांडणाऱ्या सुल्ली-बुल्ली डिल्सच्या आरोपींना ते अल्पवयीन आहेत, म्हणून जामीन दिला गेला, कारण ते हिंदू होते. शिवाय इतरही गुन्ह्यात चुकून एफआरआय झालेल्या आरोपींना कोर्टाने तत्काळ जामीन दिला.
अर्थातच जामीन मिळण्याचा क्रायटेरिया ते ‘हिंदू’ असणं होतं. यती
नरसिंहानंद सारख्या हिंसक साधूने मुस्लिमांना मारून टाकण्याची भाषा केली. त्याला
अटक झाली व काहीच दिवसात तो जामिनावर मुक्तही झाला. पुन्हा त्याने तसेच गुन्हे
अनेक ठिकाणी केले. तो हिंदू असल्याने अजूनही मोकाट आहे.
दुसरीकडे पीडित मुसलमानांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. पोलीस त्याींना कुठलेही सहकार्य करीत नाही. उलट त्यांनाच ‘दोषी’ ठरवून त्याचं सामजिक चारित्र्यहनन केलं जात आहे. उन्मादी जमाव आरोप सिद्ध झालेला नसताना त्यांचा शिरच्छेद (मॉब लिचिंग) करत आहे. गौभक्षक म्हणून सामाजिक प्रतिमा मलीन करून मुसलमानांना बदनाम केलं जात आहे. धर्माच्या नावाने आज घडीला मुस्लिम विरोधी विचारमंचावर बहुसंख्य समुदायाचे एकत्रिकरण करण्याची ही प्रक्रिया अधिक जलद झालेली दिसते.
कोरोना प्रसारास दोषी ठरवून त्यांचा सामाजिक बहिष्कार केला गेला. त्यांचे व्यापार-उदीम, व्यवसाय बंद केले गेले. मुसलमानांशी आर्थिक देव-घेव, व्यवहार करू नये, अशा घोषणा उघडपणे दिल्या गेल्या. त्यांचे आर्थिक स्त्रोत बंद केले जात आहेत. धर्मांध भगवे गुंड फळांचे दुकानदार, पथारीवाले, फिरस्ती व्यवसायिकांना हिंदू वस्तीमध्ये व्यापारास मनाई केली गेली. ह्या सर्व प्रकाराला राजकीय हिदुंत्व धारण न केलेला व पुरोगामी, संविधानवादी, लोकशाही समर्थक म्हणवणारा गट मूक समर्थन देतोय. त्यामुळे स्वाभाविक भगव्या टोळ्यांचा हिंसक जोर वाढलेला दिसतो.
वाचा : काश्मीरच्या अर्धवट फाईल्स
वाचा : नागरिकता विधेयक म्हणजे नव्या धोक्याची चाहूल
वाचा : मुसलमानांचे राजकीय व सांस्कृतिक आत्मभानआत्मरक्षण झाला गुन्हा!
मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन भगव्या टोळ्या तलवारी, बंदूका नाचवतात. ‘मुल्ले काटे जाएगे’, ‘हिंदुस्थान में रहना है तो, जय श्रीराम कहना होगा’ अशा विकृत घोषणाबाजी सुरू असते. मुस्लिमांच्या प्रार्थनास्थळावर चढून भगवे झेंडे फडकवले गेले. मस्जिदींचे पावित्र्य नष्ट करून नासधूस केली. पवित्र ग्रंथांची अवमानना झाली. महिला, वृद्धांना उद्देशून गलिच्छ शेरेबाजी केली गेली. मुस्लिमांना अस्थिर करून हिंसेला उत्तेजन दिलं गेलं. अशावेळी मुस्लिमांनी आत्मसरंक्षण म्हणून हिंसेचा प्रतिकार केला की, त्यांना गुन्हेगार ठरवून कायदा केला जात आहे.
जहांगीर पुरीमध्ये नेमकं हेच झालं. स्थानिक मुस्लिमांनी बचाव म्हणून प्रतिरोध केला. मस्जिद व घरांवर हल्ले करणाऱ्या उन्मादी झुंडींवर दगडांचा वर्षाव केला. आत्मरक्षणसाठी प्रतिकार केला. परिणामी भगव्या गुंडांनी रामनवमीच्या मिरवणूकीत दगडफेक केली, अशी अफवा पसरवली. अर्थातच हेच कारण पुढे करत जाहंगिरपुरीच्या दंगलीला अधिकृत ठरवलं गेलं. न्यूज चॅनल, सोशल मीडियातूनन मुसलमांना दोषी ठरवलं गेलं. पीडितांवर झालेले हल्ले न दाखवता एकतर्फी बातम्या दाखवत गोदी मीडियाने वातावरण निर्मिती केली.
परिणामी पीडितांना दोषी ठरवून खरगोनसारखं ‘ऑपरेशन बुलडोज़र’ राबविण्याचा नाटकीय कट आखला गेला. दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता १९ एप्रिलला जहांगीर पुरी परिसरातील अतिक्रमण हटवण्याबाबत उत्तर दिल्ली महापालिकेचे (भाजपचे) महापौर आणि आयुक्तांना पत्र लिहितात. त्याच दिवशी एमसीडी आयुक्त दिल्ली पोलिसांना पत्र लिहून बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ४०० पोलिसांची मागणी करतात. लागलीच पोलिसांकडून ही विनंती मान्य केली जाते. पुढे धोक्याची भनक ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’ ह्या नागरी संघटनेला लागली. संघटना सुप्रीम कोर्टात धाव घेते.
दुसऱ्या दिवशी, २० तारखेला सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करून जहांगीर पुरी भागातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई स्थगित देतो. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तातडीने बुलडोजर थांबतील, असं मानलं जात होतं. पण असं झालं नाही. एमसीडीने कोर्टाच्या निर्णयाची अवमानना करत अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरुच ठेवली. या प्रक्रियेत रहिमा बेगमचं घर पाडलं गेलं. शिवाय एका मस्जिदीचा समोरचा भाग पाडून झाला होता. मस्जिदीच्या शेजारी असलेल्या मंदिराला वगळून बाकी इतरही काही इमारतींचे नुकसान केलं गेलं, ज्यांचे फोटो आणि वीडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वरिष्ठ अधिवक्ता दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की, जहांगीरपुरीतील अतिक्रमण हटवण्यास स्थगिती असूनही ती अद्याप थांबलेली नाही. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने आदेशाची माहिती योग्य अधिकाऱ्यांना द्यावी आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी होईल याची खात्री करण्याचे निर्देश रजिस्ट्री विभागाला दिले. त्यानंतर कारवाई थांबली पण तोपर्यंत बरंच नुकसान झालेलं होतं. अर्थात हे उघड आहे की, हा पक्षपात फक्त मुस्लिम म्हणून झाला आहे.
वाचा : सत्तेचे सेक्युलर गणितवाचा : प्रज्ञा सिंह उमेदवारीचा घातक पायंडा
अलगीकरणाचं नरेशन
दुर्दैवाने सांगावं लागतं की, भाजप व संघाच्या केंद्रीय सत्तेत मुसलमानांना दूय्यम वागणूक दिली जात आहे. त्यांना नागरिक म्हणून जगण्याचा हक्क नाकारला जातोय. त्यांच्या वेदनांना आवाज मिळू नये, असा ‘बंदोबस्त’ केला जातोय. त्यांना देशद्रोही, हिंदूद्रोही, रोहिंग्या, बांग्लादेशी, पाकिस्तानी घोषित करून हिणवलं जात आहे.
अर्थातच त्यांच्या न्यायाच्या बाजूने कोणी उभं राहू नये, यासाठी हे ‘नरेशन’ तयार होतंय. जसं २० वर्षांपूर्वी देशात दहशतवादाच्या नावाने असंख्य मुसलमानांना जेरबंद केलं जात होते. वास्तविक हैदराबाद, मालेगाव, समझोता एक्सप्रेस इत्यादी बॉम्ब खटल्यात भगवे दहशतवादी सक्रिय होते. तपास यंत्रणांनी ह्या हल्ल्यामागचे शातीर हिंदुवादी धर्मांध शोधून काढले. परंतु त्या खटल्यातही भगव्या प्रशासकांनी मुस्लिमांना गोवलं.
प्रत्येक मुस्लिम दहशतवादी, म्हणून तो ‘राष्ट्रद्रोही’, अशी प्रतिमा तयार करून आई-वडिल, नातेवाईक, शेजारी, मित्र, दोस्त मंडळी व इतर सामान्यांची सहानूभूती, मदत, नौतिक समर्थन मिळू दिलं नव्हतं. दहशतवादाच्या नावाने मुस्लिमांचे अस्तित्व संकटात आणलं गेलं. मोदीप्रणित हिंदुवादी सत्ताकाळात अगदी तसंच सुरू आहे.
मुसलमानांना घुसखोर, रोहिंग्या व बांग्लादेशी घोषित
केलं की, त्यांची हत्या, शिरच्छेद, खून करणे, त्यांचे अस्तित्व संपवणे, त्यांच्या
स्त्रियांची छेड काढणे, बलात्कार करणे अधिकृत होऊन जातं. त्यास हिंदूविरोधी ठरवून
उन्मादी जमाव त्यांच्यावर सोडला जातो. मग सद्विवेक गमावलेली मंडळी त्यांच्या पाठिशी का म्हणून उभं
राहील!
अर्थात ते राजकीय हिंदुत्वविरोधी असले तरी आपण कोणाचं तरी मानवी हक्क नाकारतोय, त्यांच्या जगण्याचं स्वातंत्र्य काढून घेतोय, त्यांच्यावर होत असलेल्या दोषारोपणाला बळकटी देतोय, याचे कदापि भान नसते. सहाजिक तो हिंदू विरुद्ध मुसलमान असाच विचार करत आहे. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंची ओळख केवळ धर्मांध झुंड/टोळी एवढीच उरलेली दिसते. किंबहुना मोदींच्या राज्यात हिंदुवादी धर्मांध रेट्यामुळे बरं-वाइट समजण्याची सामान्य मानवाची कुवतच नष्ट झालीय.
मुसलमानांनी बॅ. जिनांना नाकारून गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकरांचा स्वीकार
केल्याची किती मोठी ही शिक्षा! स्वातंत्र्यासाठी अगणित मुस्लिमांनी
आपले प्राण त्यागले. त्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मुसलमानांच्या
जगण्यावर टाच आणली जाणं दुर्दैवी आहे. त्यांचं भारतीय अस्तित्व नष्ट करण्यासाठी राजकीय
हिंदुत्व धारण केलेला प्रत्येकजण प्रयत्नशील दिसतोय. ज्यांच्या मतांवर
वर्षानूवर्षे सत्ता गाजवली अशा राजकीय पक्षांनी मुस्लिम समूदायाला वेगळं पाडलं आहे.
कोणी आहे का मुसलमांनाच्या वेदना ऐकणारा!
मेल-kalimazim@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com