एकात्म समाजाचे शांतीदूत मौलाना आज़ाद

भाजपने २०१४ साली केलेल्या सत्तांतर व त्यानंतरचा कालावधी हा धार्मिक ध्रुवीकरणासोबत ‘हिंदू राष्ट्रवाद’च्या मीडिया ट्रायलचा काळ म्हणून गणला जाईल. गेल्या काही वर्षांत मतांच्या राजकारणासाठी भारतीय संस्कृतीची बहुसांस्कृतिक सहिष्णू रचना आणि त्याच्या मूल्यव्यवस्थेला धक्का पोहचवण्यात आलेला आहे.

भारतीय समाजमन कधी नव्हे ते यावेळी मोठ्या प्रमाणात कलुषित झालं आहे. हजारो वर्षांपासून गुण्या गोविंदानं राहणारा हा समाज अचानक परस्पर वैरी म्हणून एकमेकांकडे पाहत आहे. भाजपने हिंदू मतपेढी मजबूत करण्याच्या स्वार्थासाठी भातीय सभ्यता, सलोखा, संमिश्र संस्कृती आणि सहजीवनावर घाला घातला आहे. परिणामी भारतीय एकात्म समाज हा धर्मा-धर्मात व जाति-जातीत विभागला गेला आहे.

बहुसंख्याक असलेल्या समाजगटाकडून अल्पसंख्य मुस्लिमांना केवळ धर्म अलग आहे म्हणून त्यांना वेगळेपणाची वागणूक दिली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे दिसणे, राहणे, खाणे, उपासना पद्धती, प्रार्थना स्थळे डोळ्यात खुपू लागली आहे. अशा धर्मवादी वातावरणात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या ‘मिश्र संस्कृती’चा धागा पुन्हा एकदा गुंफण्याची गरज निर्माण झाली आहे. तथाकथित धर्मवादी संघटनांचा विखारी उन्माद रोखण्यासाठी भारतातील बहुसांस्कृतिक वैभव असलेल्या ‘गंगा-जमुनी संस्कृती’ प्रवाह नव्यानं रुजवण्याची गरज आहे.


व्यापक दूरदृष्टी

११ नोव्हेबर स्वतंत्र भारताला शैक्षाणिक व सांस्कृतिक क्षेत्राला नवी दीशा देणाऱ्या मौलाना आज़ाद यांचा जन्मदिवस. सरकारतर्फे हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा होतो. मौलानांचे राहणीमान व आचार-विचार एक आदर्श होते. २२ फेब्रुवारी म्हणजे भारताला ‘दार ल अमन’ म्हणजे जागतिक शांततेची भूमी बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आज़ादांचा हा स्मरण दिन.

१८८८ साली अरबस्थानातील मक्का शहरात जन्माला आलेले हे व्यक्तिमत्व स्वंतत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यांनी आपल्या दूरदृष्टीतून भारताला एकविसाव्या शतकापर्यंत घेऊन जाणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली.

संगीत, नाटक, कला व साहित्य अकादमी स्थापन करून भारताच्या सांस्कृतिक वैभवात कमालीची भर टाकली. या संस्था स्थापनेतून मौलाना म्हणवणाऱ्या आज़ादांची दूरदृष्टी किती व्यापक होती हे लक्षात येते.

धर्म, समाज आणि हिंदु-मुस्लिम एकतेच्या क्षेत्रात मौलाना आज़ादांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. हिंदु-मुस्लिम एकतेवर त्यांचे भाषण, विधाने, लेखातील मजकूर वारंवार उल्लेखित केले जातात.

किंबहुना काही ठरावीक वाक्यांशिवाय त्यांच्यावरील कुठलाही लेख पूर्ण होत नाही. मार्च १९४० मध्ये काँग्रेसच्या रामगढच्या अधिवेशनात दिलेल्या भाषणात आज़ाद म्हणतात, “स्वराज्य आणि हिंदु-मुस्लिम एकता या दोहोंपैकी एकाची निवड करायची झाल्यास मी हिंदु-मुस्लिम ऐक्याची निवड करेन. कारण स्वराज प्राप्त करण्यास विलंब झाला तर माझ्या देशाचं नुकसान होईल, पण हिंदु-मुस्लिम ऐक्य साध्य झालं नाही तर सबंध मानवजातीचे नुकसान होईल आणि ते मी कदापि सहन करू शकणार नाही.”

अजून एके ठिकाणी मौलाना म्हणतात, “एकाच रक्ताचे भाऊभाऊ आपसात लढतात. एकाच वंशाचे इंग्रज आपापसात कडून ‘वॉर ऑफ रोझेस’ झाले. ब्रिटन-अमेरिकेची लढाई झाली. हिंदु-मुसलमानांत थोडे कलह झाले म्हणून परक्यांनी आम्हास का हिणवावे? आधी त्यांनी येथून जावे. आम्ही गुण्यागोविंदाने नांदू.”

मौलाना आज़ाद यांनी आपल्या कृतीतून, लिखाणातून धार्मिक सहिष्णुता व सौहार्दतेचा संदेश दिला. रामगढ़चे उपरोक्त भाषण दोन विभिन्न धार्मिक समुदायात एकात्म शक्तीचे बळ निर्माण व्हावे, या हेतुने त्यांनी मांडणी केली होती.

भाषणात एका ठिकाणी ते म्हणतात, “अनेक मानवी अशा संस्कृती आणि धर्म भारताकडे प्रवाहित व्हावेत. भारताच्या आतिथ्यशील भूमीत घर सापडावे आणि भटकणाऱ्या अनेक मानव समूहांना इथे विश्रांतीस्थळ लाभावे ही भारताची इतिहासदत्त नियतीच होती. इतिहासाच्या प्रभात काळापूर्वीच हे भटकते मानव समूहांचे तांडे भटकंती करीत करीत वाट काढीत हळूहळू भारतात येऊन धडकले आणि नंतर त्यांच्या पाठोपाठ नवागतांच्या लाटा मागून लाटा येऊन धडकल्या. भारताच्या अफाट आणि सुपीक भूमीने ह्या सर्वांचे स्वागत केले आणि त्यांना आपल्या हृदयाशी धरले.”


ऐक्याचा पुरस्कार

मौलाना आज़ाद यांनी हयातभर हिंदु-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला. प्रागतिक व आधुनिक विचारांकडे त्यांचा ओढा होता. त्यांचा वेळोवेळी पाठपुरावाही ते करीत.  नेहरूंच्या प्रागतिक धोरणांना त्यांनी सातत्याने समर्थन दिलं व त्यांच्या पाठीशी ते सतत उभे राहिले. धर्माधिष्ठित राष्ट्रवादाला त्यांनी कधीच मान्यता दिली नाही. फाळणीला अखेरपर्यंत विरोध दर्शवला.

धर्माच्या आधारे कुठलाही राष्ट्रवाद किंवा राष्ट्र उभारले जाऊ शकत नाही, अशी त्यांची ठाम धारणा होती. असगरअली इंजिनियर यांनी ‘इस्लाम एण्ड मॉडर्न एज’ या पत्रिकेत मौलाना आज़ाद यांच्यावर एक छान लेख लिहिला आहे. त्यात इंजिनियर यांनी आजादांच्या ‘वहादत ए दीन’या संकल्पनेवर भाष्य केलं आहे, वहादत ए दीन म्हणजे राष्ट्रीय एकात्म; याचा उहापोह करताना इंजिनियर लिहितात,

मौलाना आजादांनी कुरआनच्या दृष्टिकोनातून हिंदुझम, जैनिझम, ख्रिश्चनिटी, बुद्धिझम, ज्यूडॅझम आणि झोराष्ट्रीनिझम समजून घेतलं. या धर्मांना त्या अनुषंगाने भाष्य करत युक्तिवाद केला.”

इंजिनियर पुढे म्हणतात, “स्वातंत्र्यप्राप्तीच्या संघर्षामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना इतर धार्मिक आस्था असणाऱ्या सहकाऱ्यांशी विशेषत: हिंदुशी सहकारात्मक भूमिका घ्यावी लागली. त्यातूनच एका बाजूला हिंदु-मुस्लिम ऐक्य तर दुसऱ्या बाजूला सर्व धर्माची एकता ‘वहादत ए दीन’वर त्यांनी भर दिला. स्वत:च्या या संघर्षातून त्यांनी धार्मिक एकतेची संकल्पना मांडली.”

मौलानांनी इंग्रजी भाषेचा व त्यातील धर्मग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. आज़ाद धर्मपंडित असले तरी ते बरेचसे आधुनिक होते. आजादांवर सर सय्यद, मौलाना शिबली नोमानी, अल्ताफ हुसैन हाली, मौलाना हुसैमदनी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.

उलेमा, कवि, साक्षेपी पत्रकार, संपादक, लेखक, तत्त्वज्ञ, राजकीय नेता अशा विविधांगी प्रतिभेनं त्यांचं व्यक्तिमत्व सारगर्भित झालेलं होतं. वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षी त्यांनी लिखाण सुरू केलं. सर सय्यद अहमद खान यांचे विचार वाचून आपणही हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी वृत्तपत्र सुरू करावं असं त्यांना वाटलं. सोळाव्या वर्षी त्यांनी एका वृत्तपत्राचे संपादन केलं. सामाजिक व धार्मिक प्रबोधनासोबत ते इंग्रजी सत्तेविरोधात सडेतोड लेखन करत. परिणामी ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवली.

ब्रिटिशांनी हे वृत्तपत्रे जप्त केल्यानंतर त्यांनी १९१२ साली कलकत्त्याहून स्वत:चे अनियतकालिक ‘अल हिलाल’ सुरू केलं. या वृत्तपत्रातून त्यांनी क्रांतिकारी विचार समाजात मांडला. स्वातंत्र्य आंदोलनात या वृत्तपत्राचं महत्त्वाचं योगदान होतं. आपल्या लेखणीतून त्यांनी वारंवार ब्रिटिश सत्तेविरोधात प्रहार करत राहिले.

अल हिलालमधून ते कुरआनचे भाषांतर व त्यावरील भाष्य प्रामुख्याने छापत. इंग्रज सत्तेवरचा संताप आणि त्या सत्तने देशातील जनतेची व विशेषत: मुस्लिमांच्या संपत्तीची केलेली लूट यावर ते सातत्याने लिखाण करत. यासह मुस्लिमांच्या सामाजिक व व्यावहारिक अवगुणांवरही त्यांनी वारंवार प्रहार केला.

प्रागतिक विचारांसंदर्भात दिल्लीच्या जामा मस्जिदीवरून त्यांनी मुस्लिमांना उपदेश करत म्हटलं होतं, “अज़ीज़ों, तब्दीलियों के साथ चलो। ये न कहो इसके लिए तैयार नहीं थे, बल्कि तैयार हो जाओ। सितारे टूट गए, लेकिन सूरज तो चमक रहा है। उससे किरण मांग लो और उस अंधेरी राहों में बिछा दो। जहां उजाले की सख्त ज़रुरत है।

मुस्लिम समाजात आधुनिक विचार रुजावेत व त्यांनी राजकीय सजगता प्राप्त करून घ्यावी यासाठी मौलाना सतत प्रयत्नशील होते. समाजाने विकास करून घ्यावा त्यासाठी सरकार संस्था किंवा शासनाच्या उपकारावर अवलंबून राहू नये, असं त्याचं ठाम मत होतं. त्याविषयी त्यांनी १ सप्टेबर १९१२च्या अल हिलाल वृत्तपत्रात म्हटलं होतं,

दर हकिक़त मुसलमानों की मौजूदा गुमराहियों की इब्तदा उसी वक्त से हैं जब उन्होंने चलने के लिए पहला कदम उठाया था। बुनियादी ग़लती यह थी कि अपने तमाम कामों के लिए हुकूमत पर ऐतमाद करने का रास्ता अख्तियार किया और बगैर उस टेक के बैठने की आदत ही नही डाली। जब मर्ग-द्वाम ने आने के लिए मुज्तरब हो तो सैय्यद क्यों ग़फ़लत करे? इस रविश का नतीजा यह निकला कि वह इब्तदा से लेकर आख़ीर तर महज एक कठपुतली बनकर रह गए, जिसकी डोरे पर्दे के अंदर थीं और नचाने वाला अपनी बाज़ीगरी ते मसालेह के मुताबिक जिस तरह चाहता था उनको नचाता था।

भारतात एकत्र राहणाऱ्या विविध धार्मिक समुदायात आंतरसंवाद प्रस्थापित व्हावा, यासाठी ते सतत प्रयत्नरत असत. एका ठिकाणी ते म्हणतात, “जसे एक हिंदू अभिमानाने म्हणू शकतो की मी भारतीय आहे आणि हिंदू धर्माचे पालन करतो तसेच आम्हीसुद्धा तेवढ्याच अभिमानाने म्हणू शकतो की आम्ही भारतीय आहोत आणि इस्लाम धर्माचे पालन करतो. मी ही कक्षा अजून आणखी वाढवीन. भारतीय ख्रिश्चन व्यक्तीला अभिमानाने सांगण्याचा तेवढाच समान हक्क आहे की मी भारतीय आहे आणि भारताच्या एका धर्माचे म्हणजे ख्रिश्चन धर्माचे पालन करतो.”


मुस्लिमांनी केलं बेदखल

पत्रकारितेच्या माध्यमातून मुस्लिम समुदायांमध्ये हिंदु-मुस्लिम एकतेचा विचार रुजवला. आपल्या लेखणीतून त्यांनी मुस्लिमांत भारतीय लोकशाही राष्ट्रवाद व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. हा काळ भारतात दोन धर्म समाजात दूही निर्माण करण्याचा होता, ‘मुस्लिम लीग’ने धर्माच्या नावावर भारतातील मुस्लिमांना विभक्त केलं होतं.

स्वातंत्र्य लढ्यात अधिकार व हक्काची भाषा लीगमुळे सुरू झाली होती, आपण हिंदुंपेक्षा वेगळे आहोत हा विचार ‘मुस्लिम लीग’ने पदोपदी मांडला. अनेक मुस्लिम स्वातंत्र्य योद्धे व विद्वान लीगच्या विखारी प्रचाराला बळी पडले. परिणामी हिंदु-मुस्लिमात फुटीचं राजकारण जन्मास आले, अशावेळी मौलानांनी दोन समाजाला जोडणारा विचार मांडला.

अलगता व फुटीर प्रवृत्तीविरोधात त्यांनी प्रचंड संघर्ष केला. परिणामी जिना व मौलानामध्ये बेबनाव राहिला. दुर्दैव असं की तत्कालीन फुटीरवादी शक्तींनी हाच ‘इस्लामी राष्ट्रवाद' म्हणून प्रचारित केला. गुबार ए खतीर या पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं,

“कोई अपना दामन फूलो से भरना चाहता है, कोई काँटों से। कोई नही पसंद करेगा कि तहरी दामन रहे (पदर खाली रहाणे)। जब लोग कामजोयियों (यश) और खुशबख्तियों (आनंदात वेळ जाणे) के फूल चुन रहे थे तो हमारे हिस्से में तमनाओं और हसरतो के काँटे आये। उन्होंने फूल चुन लिये और काँटे छोड दिये। इम ने काँटे चुन लिये और फूल छोड दिये।”

मौलानांचा खरा विचार रुजला नसल्याने मुस्लिम समाजात अलिप्ततावाद बोकाळला. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही संकल्पना वारंवार माथी मारली गेली, आजही फारशी वेगळी परिस्थिती नाही. धार्मिक उलेमांनी सोयीचा विचार घेऊन तो प्रसवला. आज अनेक इस्लामी विद्वानाला आजादांचे विचार धोकादायक वाटतात, अनेक इस्लामी धर्मपंडित मौलानांना अनुउल्लेखाने मारतात.

वर्तमान बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत इस्लामी व अन्य धर्म पंडितांनी घेतलेली भूमिका संशयस्पद आहे. राष्ट्रवाद, सामाजिक ऐक्य यापेक्षा धर्म त्यांना महत्त्वाचा वाटतो. आज धर्मवाद्यांमुळे दोन समाजात दूफळी निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत मौलाना आज़ाद यांचे धार्मिक सहिष्णुतेचे विचार व सामाजिक ऐक्याचे प्रयत्नांचा प्रचार-प्रसार करणे क्रमप्राप्त ठरते.

कलीम अजीम, पुणे
मेल: kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,37,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,292,व्यक्ती,17,संकलन,61,समाज,246,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: एकात्म समाजाचे शांतीदूत मौलाना आज़ाद
एकात्म समाजाचे शांतीदूत मौलाना आज़ाद
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg8BsQTbgFP04a_-kdHP65IN9_7Bp19ijhEBlLxg4b0FxZFpAwK0jlotetauYTcPQmxsNynygxt3Xm_jEGe-t870FaJcI720mQyJbCQp6Rhr5NcIzcH3Ml9xp1xelYqVvSz6sC_RJYa0veRpLC6MGcIIMoY8Enos9G4pJPN-DN7DdEhU9fTzTh2QXS04Q9O/w640-h380/Azad.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg8BsQTbgFP04a_-kdHP65IN9_7Bp19ijhEBlLxg4b0FxZFpAwK0jlotetauYTcPQmxsNynygxt3Xm_jEGe-t870FaJcI720mQyJbCQp6Rhr5NcIzcH3Ml9xp1xelYqVvSz6sC_RJYa0veRpLC6MGcIIMoY8Enos9G4pJPN-DN7DdEhU9fTzTh2QXS04Q9O/s72-w640-c-h380/Azad.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/11/blog-post_11.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/11/blog-post_11.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content