
भारतीय उपखंडात ‘अर्तुगल गाज़ी’ (तुर्की उच्चार - दिरलिस: एर्तरुल) नावाच्या
एका महासिरियलची जोरदार चर्चा आहे. लहान मुलं, महिला, सामान्य जनांपासून ते उलेमा,
परंपरावादी, अभ्यासक, विचारवंत व भाष्यकाराला त्यानं भुरळं पाडली आहे. बहुतेकजन
त्याला इंटरटेन्मेंट म्हणून बघत आहेत. ठरावीक मंडळी त्यातून इस्लामचा सुवर्णकाळ
समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
ही सिरीज इस्लामी राज्यसंस्थेच्या सहा शतकानंतरची पार्श्वभूमी कथन करते. मंगोलीयन चंगेज
खान (Genghis Khan) (हा मुस्लिम नव्हता) व नंतर हलाकूनं (शेवटची) अब्बासी खिलाफतची वाताहत लावली. त्यानंतरचा काळ आणि ऑटोमन
साम्राज्य उभारणीचा पूर्वकाळ अशा दोन भागात अर्तुगल गाज़ीचा पट विस्तारलेला आहे. ऑटोमन
साम्राज्याचा संस्थापक उस्मान यांच्या वडिलांची ही कथा आहे. ज्यांना सुमारे १०० वर्षे दीर्घ आयुष्य लाभलं होतं.
पार्श्वभूमी
सहावं शतक हे मोठमोठी साम्राज्ये उभारणाऱ्यांचं शतक होतं. चीनमध्ये तांग
वंशानं तर भारतात हर्षवर्धनाने साम्राज्य उभारलं. यूरोपमध्ये जस्टिनियन याने बायझँटाइन
साम्राज्य उभारलं. पर्शियात नौशेरवानने ‘सासानियन’ सत्तास्थापना केली होती. त्याच काळात अरबस्थानात इस्लामी न्याय्य
तत्त्वावर आधारित राजकीय शासनसंस्थेची स्थापना झाली.
ईसवीं ६३२मध्ये प्रेषित मुहंमद (स) यांच्या महानिर्वाणानंतर इस्लामी ‘खिलाफत’ राज्यसंस्था उदयास आली. ‘खल्फ’ या मूळ शब्दावरून ‘खलिफा’ हा शब्द बनला आहे. खल्फ म्हणजे मागे ठेवणे. म्हणूनच खलिफा या शब्दाचा अर्थ उत्तराधिकारी
व राजप्रतिनिधी असा होतो. त्यानुसार हजरत अबू बकर हे पहिले खलिफा ठरले.
पैगंबरांनी आपल्या हयातीत इस्लामी राज्यव्यस्थेची संकल्पना मांडून ठेवली होती.
पण ती अस्तित्वात आलेली नव्हती. प्रेषितांचे सहकारी अबू बकर यांनी ती प्रत्यक्षात
आणली.
प्रेषितांच्या निर्वाणानंतर मुसलमान अस्थिर व हवालदिल झाले होते. प्रदेशात अनागोंदी माजली. नेतृत्वाशिवाय इस्लामचं कसं होईल, हा बिकट प्रश्न त्यांना पडला होता. अशावेळी अबू
बकर यांनी सत्तेची सूत्रे घेतली व मुसलमानांचे नेतृत्व केले. ठिकठिकाणी उदयास
आलेले बंड त्यांनी मोडून काढले. कुरआन व हदीसवर आधारित प्रेषितांच्या संकल्पनेवर
आधारित राज्यसंस्था त्यांनी उभी केली.
अधर्मीविरोधात युद्धे लढली. तह केला. साम्राज्याचा विस्तार केला. त्याचं एक
प्रसिद्ध वचन आहे, “जोपर्यंत मी ईश्वराच्या व त्याच्या प्रेषिताच्या
आज्ञेचं पालन करतो आहे, तोवर तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन करा आणि जर मी आज्ञेचा भंग
केला तर मग तुम्ही माझ्या आज्ञेची पालन करण्याची गरज नाही.”
बर्नार्ड लेविस आपल्या ‘दि पॉलिटिकल लँग्वेज
ऑफ इस्लाम’ या पुस्तकात अबू बकर यांच्या राजवटीला इस्लामच्या
इतिहासातली सर्वात महान व महत्त्वाची सार्वभौम संस्था म्हणतो. अबू बकरना केवळ अडीच
वर्षांचा कालवधी मिळाला. ६१व्या वर्षी त्यांच निधन झालं.
त्यांच्यानंतर हजरत उमर इब्न खत्ताब यांच्याकडे इस्लामी सत्तेची सूत्रे आली. त्यांनाही
सहा वर्षांचा कालावधी मिळाला. त्यांच्यानंतर हजरत उस्मान इब्न अफ्फान यांनी खिलाफतची
सूत्रे स्वीकारली त्यांना १२ वर्षांचा कालावधी मिळाला. त्यानंतर प्रेषितांचे
नातू हजरत अली इब्न अबी तालिब यांनी खिलाफतची सूत्रे आली. ही छल-कपट व अंतर्गत
कलहामुळे चर्चेत राहिली.
पहिले खलिफा हजरत अबू बकर यांना नैसर्गिक मृत्यू आला. परंतु बाकी तीनही खलिफांची
हत्या झाला. या हत्येमागे राजकीय नेतृत्वाचा हपापलेपणा व प्रदेशातली अनागोंदी
कारणीभूत होती. या पाच शतकाचा सार एका शब्दात मांडायचा झाल्यास सत्तेसाठी
हिंसाचार, तान-तणाव-संघर्ष, कुरापती, अनागोंदी माजवून आपल्याच धर्मबांधवाविरोधात युद्धे
खेळली गेली. त्यातच या राजवटीचा अस्त झाला. पुढे वारसाहक्कासारखे खिलाफतीला ओलीस ठेवलं गेलं.
दरम्यान या कलावधीत इस्लामिक राज्यसंस्थेने आशिया व आफ्रिकापर्यंत मजल मारली
होती. सर्वात बलाढ्य व बलशाली साम्राज्य अशी ओळखी या राज्यसंस्थेची होती. उम्मयाद
राजवटीत मुसलमान, इस्लामी साम्राज्य व इस्लामी तत्त्वज्ञानाची मोठी हानी झाली. नंतरच्या
अब्बासी राजवटीत इस्लामला खऱ्या अर्थाने आपला सुवर्णकाळ अनुभवता आला.
यूरोपीयन साम्राज्यवादाच्या क्रुसेडप्रणित वर्चस्ववादी वातावरणात क्रूर बायझेंटाइन शासक राज्य करीत होते. कार्ल मार्क्सच्या मते बायझेंटाइन राज्य हे इतर सर्व राष्ट्रांत अत्यंत वाईट सरकार असलेली राजवट होती. एम.एन रॉय यांच्या मते राजवटीत सामान्याचे अनियंत्रित शोषण सुरू झालं होतं. राजे व त्यांची प्रजा अंधश्रद्धेत गुरफटले होते. परिणामी शासकांची राज्यावरील पकड ढिली पडत चालली होती. परंतु साम्राज्यविस्तारासाठी हत्या, लूटालूट सिुरू होती.
दुसरीकडे अंतर्गत कलह, अनागोंदी इत्यादी
प्रकारातही अब्बासी खलिफा तग धरून होते. पण क्रूर समजल्या जाणाऱ्या मंगोल जातीच्या चंगेज खान (चंग इज कहेन)ने अकराव्या शतकात या राजवटीचा शेवट केला. या आक्रमणात लाखों लोक मारली
गेली. अनेकांनी आपले नातेवाईक, संपत्ती, जमीन-जुमला गमावले. रक्ताचे सडे, नृशंसता,
अमानवीयता व अत्याचाराची सर्व कीर्तीमाने चंगेज खानने तोडली होती.
त्याचकाळात तुर्की टोळ्या आपलं साम्राज्य व अस्तित्वासाठी एकीकडे मंगोल तर
दूसरीकडे ख्रिश्चन साम्राज्याविरोधात लढत होती. तुर्क तसे पराक्रमी वीरपुरुष समजले
जातात. त्याच्या पराक्रमाच्या अनेक कथा मध्ययुगीन इतिहासात पहायला मिळतात. या तुर्की
पराक्रमी साम्राज्य स्थापनेचा महा पट ‘अर्तुगल
गाज़ी’ या सिरियलमध्ये मांडलेला आहे.
तुर्कीची उस्मानिया राजवंश त्याकाळातील जगातली सर्वात मोठी राजवट होती. सुमारे सात शतके त्यानी इस्लामिक
राजसत्तेचा काळ गाजवला. १९व्या शतकात ब्रिटिश, फ्रेंच व अन्य़ आक्रमकांच्या
वसाहतवादी धोरणामुळे त्याचा शेवट झाला.
जवाहरलाल नेहरुंनी आपल्या ‘ग्लिम्पेस ऑफ वर्ड हिस्टरी’ पुस्तकात केमाल
पाशाने ब्रिटिशाविरोधात दिलेला लढा फार सुंदर शब्दात रेखाटला आहे. तर सय्यद अमीन
यांनी अतातुर्कच्या चरित्रात ऑटोमन राजवटीची पार्श्वभूमी सांगत तुर्की साम्राजाचे ब्रिटिशांनी
तोडलेले लचके रेखांकित केलेले आहे.
दिवाळीतच या सिरियलबद्दल कळालं होतं. काही इंटरनेशनल वेबसाईट वाचताना त्याचे
रिव्ह्यूदेखील चाळले होते. पण तुर्की हुकूमशाहीचा प्रपोगंडा असेल म्हणून त्याला
टाळलं. त्यातच इमरान खान (पाकिस्तान), महाथिर मुहंमद (मलेशिया) आणि अर्दोगान (तुर्की)
यांनी यूरोपियन अँटी इस्लामी प्रचाराविरोधात एकत्रिकरणाचा घाट घातला. पुढे इमरान
खानने इस्लाम समजून घेण्यासाठी ‘अर्तुगुल गाजी’ पाहण्याचा व इस्लाम समजून घेण्याचा सल्ला देशवासीयांना दिला. तरीही या सिरिजबद्दल मला कुतुहलता
वाटली नाही. पण नेहरूमुळे तिथपर्यंत पोहोचलो. केमाल पाशाच्या प्रेमापोटी अखेर या
सिरिजकडे वळलो. शुक्रिया चाचाजी..
वास्तविक त्याची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय मला त्याकडे फिरकावसं वाटलं
नव्हतं. म्हणून तुर्की राष्ट्रवाद समजून घेण्यासाठी लॉकडाऊनची मदत झाली. त्यात
इस्लामवरची काही पुस्तके वाचली व त्यातून अर्तुगल समजून घेता आला.
अर्तुगल गाज़ी इस्लामचा सुवर्णकाळाची आठवण सांगतोच पण इस्लाम वाचनाशी वैर धरून
त्यावर टीका करणाऱ्या महाभागांना आपल्याकडे खेचतो, हे विशेष. प्यार, सास-बहू, दोस्ती,
शौर्य, दगा-फटका इत्यादी इंटरटेन्मेंटचं सर्व (मसाला) सूत्र त्यात असल्यानं त्याला
‘इन्फोटेन्मेंट मूल्य’
आहेच. शिवाय सिरीज सत्यघटनेचा इतिहास असल्यानं त्याबद्दल ओढ वाटणे सहाजिकच आहे.
अर्तुगल गाज़ीची गाथा केवळ काल्पनिक व पौराणिक नाही तर इस्लामची जीवनपद्धती
व तत्त्वज्ञान मांडणारे एक महासिरियल आहे. सहज-सोपी समजणारी कथा, भूरळ टाकणारी
दृश्यं, विलोभनीय नेपथ्य, निसर्ग सौंदर्य सिरियलच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेशा
आहेत. विशेष म्हणजे सिरिजमधील इब्नुल अरबी या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्याची विधाने ज्ञानाची
गुंगी देतात.
संवाद म्हणून हदीस व कुरआनचे कोट वापरले आहेत. नैतिकता, शहाणपण व मूल्यशिक्षणाला संवादात जागा देऊ केलेली आहे. इस्लामिक फिलोसॉफीची सहज-सोप्या
भाषेत ठिकठिकाणी मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही श्रद्धावंताला
त्याची भूरळ पडणे स्वाभाविक आहे. मला त्याच्या रिव्ह्यू करण्यात काडीचा रस नाही; पण इस्लाम समजून घेण्यासाठी ही सिरिज फार महत्त्वाचा रोल अदा
करू शकते.
अर्तुगलचे पाच सिजनमध्ये विस्तारलेले सुमारे ४५० एपिसोड आहेत. पहिला सीज़न एनोतोलियामध्ये क्रुसेडर्सच्या विरोधात अभियान है आहे. दूसरा मंगोलाच्या विरुद्ध, तीसरा ख्रिस्ती बायझेंटाइन साम्राज्यासोबतचा संघर्ष आणि चौथा सिजन सेल्जुक सम्राटाचा अंतर्गत संघर्ष पुढे पाचवा सिजन ऑटोमन साम्राज्य स्थापनेचा आहे. पश्चिमी मीडियाच्या मते दशकातली सर्वांत जास्त लोकप्रिय झालेली ही सिरिज आहे.
मूळ तुर्की भाषा असली तरी, इंग्रजी व उर्दू सबटायटल आहे. शिवाय पाकिस्तानच्या सरकारी पीटीवीनं त्याचं ओघवत्या उर्दू भाषेत डब केलं आहे. सिरियलचा मुख्य गाभा न्याय्य तत्त्वावर आधारलेला आहे. शिवाय क्रुसेडची पार्श्वभूमी सांगणाऱ्या यूरोपियन राष्ट्रवादाची क्रूरता, नृशंसता, अनैतिकता, अत्याचार, छल-कपट, दगा-फटका, ज्यू-ख्रिश्चानिटी, कॅथोलिक-प्रोटेस्टंटवाद आदी प्रकरणे आपलं नागडं सत्य समोर घेऊन येतात.
मूळ तुर्की भाषा असली तरी, इंग्रजी व उर्दू सबटायटल आहे. शिवाय पाकिस्तानच्या सरकारी पीटीवीनं त्याचं ओघवत्या उर्दू भाषेत डब केलं आहे. सिरियलचा मुख्य गाभा न्याय्य तत्त्वावर आधारलेला आहे. शिवाय क्रुसेडची पार्श्वभूमी सांगणाऱ्या यूरोपियन राष्ट्रवादाची क्रूरता, नृशंसता, अनैतिकता, अत्याचार, छल-कपट, दगा-फटका, ज्यू-ख्रिश्चानिटी, कॅथोलिक-प्रोटेस्टंटवाद आदी प्रकरणे आपलं नागडं सत्य समोर घेऊन येतात.
आधुनिक परिभाषेत काहीजण या सिरिजला ‘इस्लामी साम्राज्यवाद’ म्हणतील. पण मी त्यापलीकडे जाऊन त्याची अशी व्याख्या करतो, “भले हे इस्लामी साम्राज्यवाद असेल पण राज्यसंस्थेला क्रूसेडप्रणित, अन्याय,
अत्याचार व नृशंसतेच्या तावडीतून सोडवून आदर्श राज्यव्यवस्थेची पायाभरणी, इस्लामी न्यायशास्त्र,
तत्त्वज्ञान, हदीसची फिलोसॉफी, सुन्नाहची जीवनपद्धती, प्रेषितांच्या समान
न्यायाच्या तत्वावर आधारलेले शासन आणि इस्लामच्या श्रद्धाशील आदर्शावर नव-शासनप्रणालीची
ही पुनर्स्थापना होती.”
अभ्यासकांनी ही सिरिज अवश्य बघायला हवी, पण वाचनाशिवाय इस्लामवर टीका करणाऱ्यांनी,
ज्यांना इस्लाम वाचायचं नाही पण त्यावर तोंडसुख घ्यायचे आहे अशांनी ही सिरिज जरूर
बघावी.
वसाहत-पौर्वात्यवादी लेखक, विचारवंत-अभ्यासकांनी क्रुसेडची नृशंस हिंसा दडवून
इस्लामला हिंसक धर्म ठरवला. त्यातून इस्लामचे राक्षसीकरण करण्याची जी स्पर्धा
मध्ययुगातील इतिहास लेखकांनी राबवली तीच आजही कायम आहे. इस्लामबद्दल पूर्वग्रह तयार
करण्यात या साहित्याने व प्रचाराने मोठा हातभार लावला आहे.
त्यामुळे पूर्वग्रहमुक्त इस्लामकडे पाहणे, समजून घेणे क्वचितच घडते. तो
दृष्टिकोन अर्तुगल गाज़ी देतो. इस्लामी राज्यसंस्था व शासनप्रणाली ही नैतिकता व न्याय्य
तत्त्वावर आधारित होती आणि आहे. पण पैगंबर विरुद्ध मोझेस, पैगंबर विरुद्ध येशू असा
संघर्ष तयार करून त्याआड इस्लाम व त्याचा राजशिष्टाचार, मानवीयता, न्याय्य व नैतिकतेवर आधारित राज्यव्यवस्था
नाकारली गेली.
वाचा : तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात इकबालीज्म
वर उल्लेखित सर्व प्रेषित किताबी मजहब (पुस्तकी धर्म)ला मानणारे होते. इस्लामने कुठल्याही प्रेषितांना नाकारले नाही. सर्वांचे सारखेच महत्व इस्लाम प्रतिपादितो. सर्वांना आदर, सन्मान देतो. पण अन्य किताबी धर्म पैगंबर मुहंमद (स) यांना नाकारतात. त्यांची विटंबना करतात. त्यांच्या लेखी पैगंबर मागून आलेले साधारण मानव आहेत. त्यामुळे ते त्यांच्या आदर्श धर्म-पुरुषाचे (ईश्वराचे) महत्त्व कमी करतो. त्यामुळे त्यांनी फक्त पैगंबरांनाच नव्हे तर इस्लामला बदनाम करण्याचं षडयंत्र प्रेषितांच्या जन्मापासून व इस्लामच्या स्थापनेपासून आखण्यात आलं. त्याविरोधात मोहिमा सुरू केल्या गेल्या. ज्या आजही कार्यरत आहेत.
वर उल्लेखित सर्व प्रेषित किताबी मजहब (पुस्तकी धर्म)ला मानणारे होते. इस्लामने कुठल्याही प्रेषितांना नाकारले नाही. सर्वांचे सारखेच महत्व इस्लाम प्रतिपादितो. सर्वांना आदर, सन्मान देतो. पण अन्य किताबी धर्म पैगंबर मुहंमद (स) यांना नाकारतात. त्यांची विटंबना करतात. त्यांच्या लेखी पैगंबर मागून आलेले साधारण मानव आहेत. त्यामुळे ते त्यांच्या आदर्श धर्म-पुरुषाचे (ईश्वराचे) महत्त्व कमी करतो. त्यामुळे त्यांनी फक्त पैगंबरांनाच नव्हे तर इस्लामला बदनाम करण्याचं षडयंत्र प्रेषितांच्या जन्मापासून व इस्लामच्या स्थापनेपासून आखण्यात आलं. त्याविरोधात मोहिमा सुरू केल्या गेल्या. ज्या आजही कार्यरत आहेत.
सिरियल बघत असताना मध्येच मी काही ग्रंथ वाचली. त्यातून मला अर्तुगल समजून
घेता आला. सिरिजमधील यूरोपियन मानसिकता समजून घेण्यासाठी एम. जे. अकबर यांच्या ‘दि शेड ऑफ सॉर्ड’ची मदत झाली. त्यांनी
क्रूसेड व यूरोपीयन नृशंसता व साम्राज्यवादाचा अनर्थ सटिक पद्धतीनं रेखाटला आहे. फिलिप्स
के. हित्तीचे ‘हिस्टरी ऑफ दि अऱब्स’ या
ग्रंथातून अरबी व तुर्की इस्लामी साम्राज्यवादाची रुट्स कळाली.
कुतुहल व लॉकडाऊनचा चांगला वापर म्हणून मी पुस्तके वाचली. पण ज्यांना वाचायची
सवड नसते, उसंत नसते, वेळ नसतो व इच्छा नसते अशांनी ही सिरिज जरूर बघावी. टाइमपास,
इंटरटेन्मेंट, मनोरंजन आदी मूल्य जपून तुम्ही एका शानदार इतिहासाचे साक्षीदार होऊ
शकता.
उणिवा
अर्तुगल बघताना अनेक प्रश्न उपस्थित होतात. अर्थात घटना, सीन आणि प्रसंग प्रचंड ड्रामेटिक करून मांडले आहेत. प्रत्येकवेळी तुर्की जंगजू (योद्धे) शत्रूंना कापत सुटतात, त्यांना साधे खरचटतेदेखील नाही. इतिहास मांडताना अनेक ठिकाणी अतिशयोक्ती जाणवते. इस्लामचा आधार घेऊन साम्राज्यशाहीचे समर्थन करण्यात आल्याचे प्रतित होतं.
मुळात तुर्की प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून हे महासिरियल तयार झालं आहे. त्यामुळे कदाचित तसं झालं असावं. बीबीसीच्या मते तुर्कस्थानमध्ये टीवी ड्रामा हजारों कोटींचा बिझनेस देतो. अन्य देशात तिथल्या ्सथानिक भाषेत डब करून त्याचे हक्क विकले जातात, त्यातून भरगच्च कमाई तुर्की निर्माते करतात. हा बाजार डोळ्यासमोर ठेवूनच अर्तूगल गाजीचा पट मांडण्यात आला आहे, हे लक्षात घ्यावं लागतं.
अनेकदा इतिहास म्हणून अतिरंजन समोर येते. युरोपियन साम्राज्यवादाच्या अभ्यासकांना ते नक्कीच जाणवू शकते. शिवाय उस्मानिया सल्तनतीच्या इतिहाकारांदेखील ते जाणवते. त्यामुळे इतिहास किती व वस्तुदर्शीपणा किती असा प्रश्न अनेकदा पडतो.
थोडक्यात हा इतिहास समजून घेताना तत्कालीन काळ व त्याची राजकीय व्यवस्था, शासन पद्धती, युद्धे, तह आदी प्रसंग लक्षात घ्यावे लागतात.
अर्तुगल बघताना अनेक प्रश्न उपस्थित होतात. अर्थात घटना, सीन आणि प्रसंग प्रचंड ड्रामेटिक करून मांडले आहेत. प्रत्येकवेळी तुर्की जंगजू (योद्धे) शत्रूंना कापत सुटतात, त्यांना साधे खरचटतेदेखील नाही. इतिहास मांडताना अनेक ठिकाणी अतिशयोक्ती जाणवते. इस्लामचा आधार घेऊन साम्राज्यशाहीचे समर्थन करण्यात आल्याचे प्रतित होतं.
मुळात तुर्की प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून हे महासिरियल तयार झालं आहे. त्यामुळे कदाचित तसं झालं असावं. बीबीसीच्या मते तुर्कस्थानमध्ये टीवी ड्रामा हजारों कोटींचा बिझनेस देतो. अन्य देशात तिथल्या ्सथानिक भाषेत डब करून त्याचे हक्क विकले जातात, त्यातून भरगच्च कमाई तुर्की निर्माते करतात. हा बाजार डोळ्यासमोर ठेवूनच अर्तूगल गाजीचा पट मांडण्यात आला आहे, हे लक्षात घ्यावं लागतं.
अनेकदा इतिहास म्हणून अतिरंजन समोर येते. युरोपियन साम्राज्यवादाच्या अभ्यासकांना ते नक्कीच जाणवू शकते. शिवाय उस्मानिया सल्तनतीच्या इतिहाकारांदेखील ते जाणवते. त्यामुळे इतिहास किती व वस्तुदर्शीपणा किती असा प्रश्न अनेकदा पडतो.
थोडक्यात हा इतिहास समजून घेताना तत्कालीन काळ व त्याची राजकीय व्यवस्था, शासन पद्धती, युद्धे, तह आदी प्रसंग लक्षात घ्यावे लागतात.
कलीम अजीम, पुणे
Twiter@kalimajeem
FB/Kalim Ajeem
मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com