घुमानच्या साहित्य संमेलनाचा ‘बीग इव्हेंट’ पंजाब सरकारच्या मदतीने यशस्वीरित्या पार पडला असे जरी म्हटले जात असले तरी, प्रसार माध्यमात होत असलेलया टीकेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. नियोजनापासून ते आयोजनापर्यंतच्या अनेक तक्रारी आता हळूहळू पुढे येत आहे.
एव्हाना पंजाबवारी करुन साहित्ययात्री परतले असले तरी साठ तास प्रवासाचा
शीळ अजून संपला नाही. असे असले तरी नामदेव भक्तांनी घुमानवारी करुन बरंच काही
कमावलं असल्याचा आव आणत जालियनवाला आणि अटारीचे किस्से सांगत सुटले आहेत
दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन वादाशिवाय पूर्ण होतच नाही, हे ठरलेलं. राज्यातील साहित्यप्रेमी आणि रसिकांना आता साहित्य महामंडळाचा नियमीत होणारा वाद अंगवळणी पडला आहे. पंजाबच्या घुमानला झालेलं हे संमेलन खरोखरच वेगवेगळ्या कारणांनी ऐतिहासिक ठरलं आहे. मग तो रेल्वे लेटलतीफ प्रवास असो वा साहित्ययात्रीची प्रवासात झालेली दैना.
राज्यातून
दोन विशेष रेल्वेनं साहित्यप्रेमी
रसिकांना घुमान येथे नेण्यात आले होते. नाशिकहून विशेष रेल्वे वेळेवर निघाली असली
तरी मुंबईहून निघणारी विशेष रेल्वे सुमारे पाच तास उशीरा निघाली. त्यामुळे पुण्यात
ताटकळत बसलेल्या साहित्यप्रेमी रसिकांचे हाल झाले. दोन्ही रेल्वे विशेष असल्याने
त्या इतर नियमीत रेल्वेंना जागा करुन देत आपला प्रवास करत होती. आड जंगलात थांबून
मागून येणार्या तीन-तीन रेल्वेंना सोडत होती. त्यामुळे साहजिकच घुमानला पोहचायला
उशीर लागला.
नाशिकची पहिली रेल्वे पहाटे तीनला उड मुड तांडा येथे पोहचली. पंजाब सरकारकडून स्वागतासाठी असलेली मंडळी सांयकाळी पाच वाजल्यापासून त्या छोट्याशा स्टेशनवर रेंगाळत होती. मात्र रेल्वे पोचता फक्त चहा देणारी आणि घुमानपर्यंत घेऊन जाणारी ड्रायव्हर मंडळी हजर होती. पोलिसातील उच्च अधिकारी येईस्तोवर साहित्ययात्री बसमधे बसून डुलक्या घेत होती.
अशात स्वयसेवक म्हणून आलेल्या सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठाचा विकास मालवडेला पोटात त्रास होत असल्याने शासकीय
रुग्णालयात रवाना करण्यात आले. सुमारे दोन तासानंतर बसेस घुमानकडे निघाल्या. तर
मुंबईहून निघालेली विशेष रेल्वे अजून
पानिपतमध्येच रेंगाळली होती. त्यामुळे पहिल्या दिवसाचे कार्यक्रम चार तास पुढे
ढकलावे लागले.
पंजाब सरकारने ‘साहित्य संमेलनाचा कार्यक्रम’ शासकीय घोषीत केल्याने तिर्थाटनाला आलेल्या वारकर्यांचे चांगलेच आदरातिथ्य पंजाब सरकारच्या खजिन्यातून झाले. आगामी काळात परिसरात निवडणुका आहेत. त्यामुळे पंजाबचा शिंपी अर्थात ‘शिबा’ समाजाला खुश करुन अकालीसोबत आणण्यासाठी ‘नामदेव पॉलिटिक्स’ बादलने खेळल्याचे म्हंटले जात आहे.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम थाटामटात पार पडला. पण प्राध्यापकीय शैलीत मांडलेल्या अध्यक्षीय भाषणाने नामदेवप्रेमी पुरते कंटाळले होते. अर्थातच मोरे साहित्यिक नसून अभ्यासक आहेत. त्यामुळे साहित्य संमेलनाचे परंपरागत अध्यक्षीय भाषण खुमासदार असते हे मोरेंना सरांना अपवाद ठरले. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले साहित्यिक आणि त्यांची समर्थक भावंडे मोरेविरोधक असल्याने आलेच नाही.
सदानंद मोरे तर साहित्यिक नाही, मात्र संत साहित्याचे अभ्यासक म्हणून
त्यांना मानणारा मोठा वर्ग वारकरी आहे. त्यामुळे संमेलनात वारकरी असणार हे
ग्राह्यच होते. “विठ्ठल..!
विठ्ठल..!” ऐकण्याची सवय असलेल्या वारकरी मंडळीला अर्किमिडीज, नेमाडे, कोल्हटकर कळावेच अशी अपेक्षा रास्त नाही.
दोन माजी अध्यक्षाशिवाय कोणतेच साहित्यिक संमेलनात नव्हते. खाजगीतून आलेले दोन-तीनशे साहित्य शौकीन आणि रसिक उदघाटन समारंभ आटोपताच उत्तर भारताच्या पर्यटनाला गेली. साहित्यिक नसलेले बहुदा हे पहिलेच संमेलन असावे. या प्रकाराची चांगलीच री माध्यमाने ओढली होती. तरीही आयोजक आणि साहित्य महामंडळाने आपल्या जवळचे चिर-परिचीत; पुणे-मुंबईच्या (?) वक्त्यांना आमंत्रणे दिली होती. तर ऐनवेळी अनेकांनी संमेलनाला आमंत्रणे स्विकारुन न येणे पसंत केले. अशा परिचीत निवडीबद्दल अनेकांनी नाराजीचा सूर काढला असला तरी महामंडळाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले.
असे असले तरी पंजाबच्या विविध शहरातून अनेक दर्शक (!) मंडळी संमेलनाला आली असल्याने पन्नास हजार बैठक व्यवस्था असलेल्या सभामंडपात मराठीभाषकांना बसायला जागा नव्हती. त्यामुळे नटुन-थटून साहित्ययात्री स्वरुपात आलेली वारकरी मंडळी सभामंडपाच्या बाहेर थांबली होती.
मराठी साहित्य संमेलनाच्या मराठी भाषणाला कंटाळल्याने पंजाबीभाषक
अस्वस्थ दिसत होते. उदघाटन सत्र सुरु होताच काही वेळाने पगडीवाल्यामधे चल-बिचल
सुरु झाली. संमेलनाचा थाट-माट बघून आलेली शीख मंडळी फसवणूकीचा बळी ठरल्याचे भाव
चेहर्यावर आणत होती.
दुसर्या दिवशी सत्र तासाभराने उशीरा सुरु केले असले तरी सभामंडपात साहित्यरसिकांची तुरळक गर्दी होती. दोन सत्र झाले तरी सभामंडप ओस पडले होते. पहिल्या दिवशी नटलेली मंडळी मात्र दुसर्या दिवशी परिसंवादाला कल्टी मारुन पॅकेज वसूल करण्यासाठी अमृतसर वारीला निसटली होती. केवळ तीन हजारात संमेलन यात्रा घडवून आणणार्या निमंत्रकांचे प्रतिनीधी शनिवारी पहाटेपासून तपियाना आणि चिमा परिसरात घाई करत होते.
सकाळी अकरा पर्यंत पंजाब सरकारने बियास आणि उड मुड स्टेशन वरुन घुमानला जाण्यासाठी लावलेल्या बसेस घेऊन साहित्ययात्री तिर्थाटनसाठी अमृतसरला पसार झाली होती. आमंत्रित वक्ते रिकाम्या खुर्च्यांना परिसंवाद ऐकवीत होती. महाराष्ट्रातून दोन रेल्वेतून साहित्यप्रेमी वजा नामदेव भक्तांना आकर्षक पॅकेज वाटून निमंत्रकांनी रेल्वे भरण्याचे टार्गेट पूर्ण केले होते. यांनी सबंध रेल्वे प्रवासात किर्तन करून साहित्यिक चर्चा आणि कवीकट्ट्याला अडसर ठरली होती. नाशिक येथून निघालेल्या सुमारे आशा हजारएक यात्रेकरुंना साहित्ययात्रीचं गोंडस नाव देण्यात आलं होतं.
शिवाय या
पॅकेजमधे नवीन कपडे, घुमानचे नामदेवदर्शन, अटारीसीमा, जालियनवाला आणि अमृतसरचे सुवर्ण मंदीर असं एकत्रित पर्यटन
टूर होतं. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक नामदेवाच्या वारीला निघाले होते. असे ज्येष्ठ
नागरिक सभामंडपात ठेच लागून पडल्याची अनेक दृश्ये सर्वांनी पाहिली.
नामदेवप्रेमीचे तिर्थाटन आयोजकांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा पंजाब सरकारकडे दर्शक पुरवण्याची विनवणी केली. पंजाब सरकारने तात्काळ साप्ताहिक सुट्टी असतानाही कर्मचार्यांना कुटुंबासह संमेलन सक्तीचे केले. भाषा कळत नसल्यामुळे निघून गेलेला वर्ग बळजबरीने पुन्हा सभामंडपात येऊन बसला.
भाषिक
अपमान सहन करत पगडीधारी खूर्च्याला चिटकून होती. तर काही पगडीधारी तुरळक असलेल्या
प्रकाशकांची पुस्तके चाळत होती. तर परिसंवादात विषयासंदर्भात सांगोपांग चर्चा न
झाल्याने मराठी साहित्यप्रेमी रसिक सभागृहाबाहेर उपस्थित वक्त्यांचे दुखडे गात
फिरत होता.
तिसर्या दिवशी परतीच्या प्रवासासाठी अमृतसर मुक्कामी
असलेल्या नामदेवप्रेमी सभामंडपात हजेरी लावत होती. सभामंडपात रविवार असल्याने
पगडीधारी मोठ्या संख्येने होती. सरकारने सक्ती केल्याने पंजाबी बांधव आपल्या
कुटुंबासह हजर होते. साहित्यिकाशिवाय सुरु झालेलं हे संमेलन समारोपापर्यंत आले
होते. समारोपाला व्हीव्हीआयपी मंडळी येणार असल्याने घुमान परिसराला छावणीचे स्वरुप
आले होते. एव्हाना अमृतसरहून साहित्ययात्री बर्यापैकी सभामंडपात हजार झाली होती.
मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्याने मराठी आणि पंजाबी बहुसंख्येने उपस्थित होते. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू , महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, सुखबीर बादल, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जे.जे सिंग, गुरुदासपूरचे जिल्हाधिकारी अभिनम त्रेखा, जिल्ह्याचे एसपी इंदरसिंग इत्यादी मंडळी समारोपाला उपस्थित होती.
यावेळी अनेक घोषणा झाल्या. ज्यात चाळीस हजार लोकवस्ती असलेल्या घुमान परिसराचा विकास करण्यासाठी डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करण्यात आले. राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा बहाल करण्यात आला. गुरूनानक विद्यापीठात नामदेव अध्यासन केंद्र स्थापन करण्यात आला. घुमान ते चंदीगढ रस्ता चार पदरी करण्यासाठी सुमारे 1800 कोटीचा निधी देण्यात आला.
आनंदपूर ते नांदेड महामार्गाला मंजूरी देण्यात आली.
घुमान येथे दहा एकरा जागेवर 12 कोटी खर्चून बाबा नामदेव आर्ट्स आणी सायन्स कॉलेजचे
भूमिपूजन करण्यात आले. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात गुरूनानक
अध्यासनाची उभारणी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र साहित्य परिषदेने
मांडलेला घुमान ते पंढरपूर रेल्वेमार्गावर सुरेश प्रभू काहीच बोलले नाही.
घोषणामुळे घुमानवासी समेलन भरवल्याचे सार्थक झाल्याच्या आनंदात होते. साहित्य संमेलनाने मराठी साहित्यात काही विशेष घडले नसले तरी किमान घुमान परिसराचा विकास तर साधला यातच साहित्यप्रेमींना आनंद होता. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विकास अमृतसरच्या गुरुनानक होस्पीटलमधे पडून होता.
सुमारे तीन दिवस उलटले तरी त्याची कसलीच दखल आयोजकाच्या वतीने घेण्यात आली
नव्हती. शनिवारी त्याचे अपेण्डीक्सचे ऑपरेशन झाले. परंतु आयोजकाकडून त्याला बघायला
कोणीच गेले नाही. त्याचे सहकारी मित्र त्यास एकटाच सोडून महाराष्ट्रात परतले आहेत.
पंजाबी आणि मराठी मनाची ‘सरहद’ तोडण्यास आयोजक
यशस्वी ठरले असले तरी, मराठी साहित्यात ठोस असे काही न दिल्याने साहित्यरसिकांची
मात्र घोर निराशा झाली.
प्रकाशकांनी बहिष्कार टाकून महाराष्ट्राबाहेरील अमराठी बांधवांना मराठी प्रकाशन व्यवहाराची ओळख करून देण्याची ही नामी संधी गमावली. तसेच हिंदी साहित्यग्रंथ आणून बर्यापैकी विक्री व्यवहार करता आला असता. याचा विचार कधीही आम्हाला आला नाही असे अक्षर मानव आणि शब्द प्रकाशनने कबूल केले. मराठीपणा तसा वादाचाच विषय राहिला आहे.
मराठी माणूस असो वा नाटके किंवा चित्रपट नेहमी वादाच्या केंद्रस्थानी असतात. विशेषत: मराठी भाषा हे राज्य आणि परराज्यात कायम वादाचा विषय राहिला आहे. मराठी भाषा आणि साहित्याचे भवितव्य आणि तिच्या अस्तित्वाविषयी अधूनमधून काळजीयुक्त चर्चा होते.
मराठी अस्मिता आणि आणि
मराठी भाषा या कायम धोक्यात येणाऱ्या गोष्टी आहे, असे भासवले
जाते. त्यासाठी भरीव निधी मिळवून परिसंवादाचे आयोजन करण्यात येते. त्यात ठराविक
वक्ते आणि आयोजक यांच्यात पुणे-मुंबई पुरतीच मांडवली होते. पण साहित्यव्यवहाराचे
काय? असा प्रश्न शेवटी उरतोच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून काही साध्य
होईल का ? का असाच कोट्यवधी रुपयाचा साहित्यव्यवसाय होत
राहणार.
कलीम अजीम, पुणे
(सदरील लेख 1 ते 15 मे 2015 परिवर्तनाचा वाटसरू अंकात प्रसिद्ध झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com