आणीबाणीत तत्कालीन पंतप्रधानविरोधात अनेक व्यक्ती, संघटना आणि राजकीय पक्ष एकवटले होते. निवडणूक लागताच सर्वांनी एकत्र येण्याची घोषणा केली.. विरोधकांनी आपली एकजूट अल्पकाळात जनमानसांवर बिंबवली.
जनतेने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आणीबाणीची झळ सोसली होती, त्यामुळे त्यांनाही विरोधकांच्या एकजुटीने उत्साह आला. परिणामी जनसमुदायाचं समर्थन विरोधी पक्षांना प्राप्त होऊ लागलं. कुठलीही आघाडी किंवा पक्ष निवडणुका होईपर्यंत स्थापन झालेला नव्हता. तरीही लोक विरोधी पक्षापर्यंत पोहोचले. किंबहुना असं म्हणूया की राजकीय पक्ष जनतेपर्यंत पोहोचले नाहीत, परंतु जनता मात्र राजकीय पक्षापर्यंत पोहोचली..
निवडणुकीत मतदारांनी विरोधी पक्षाच्या बाजूने कौल दिला. सत्ता पक्षाचा पराभव झाला.. विरोधी आघाडी सत्तेत आली.. त्यावेळी विरोधी आघाडीमध्ये सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गज, इंदिरा विरोधी गट, समाजवादी, जनसंघ इत्यादी वेगवेगळी विचारधारा, अजेंडा व कृती कार्यक्रम असलेली मंडळी एकत्र आली होती. उद्देश एकच की कुठल्याही स्थितीत तथाकथित हुकूमशाही सरकारला बाजूला करायचे.. त्यामुळे वेगवेगळे विचार प्रवाह असलेले राजकीय गट एकत्र आले. तत्कालीन गरज भविष्यातील धोके त्यांना कळू लागली होती..
वर्तमान स्थितीत असेच वेगवेगळे विचारधारा असलेले राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना एकत्र आलेले आहेत.. भारत जोडो यात्रेला तमाम प्रागतिक, सुधारणावादी व्यक्ती आणि संघटना.. तसंच लहान-मोठे प्रादेशिक पक्ष.. मोदी, भाजप आणि आरएसएसच्या प्रखर विरोधकांनी राहुल गांधी यांच्या जन चळवळीला बिनशर्त पाठिंबा दिला.. गेली वर्षभर भारत जोडो कार्यक्रम ते राबवित आहेत.
या जनचळवळीचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनियंत्रित सत्तेवर अंकुश लावणे व आगामी निवडणुकीत त्यांना रोखणं असा आहे.. त्यामुळे वेगवेगळ्या विचारधारा असलेले राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना एकत्र येणे ही तत्कालीन गरज सिद्ध झाली आहे.. याशिवाय अजूनही अनेक पक्ष, संघटना, व्यक्ती विरोधी आघाडीला समर्थन देण्यासाठी सज्ज आहेत.. त्यांच्याशी वेगवेगळ्या पातळीवर संवाद केला तर त्यांच्याशी एकजूट शक्य होईल. इथं अहगंड बाजूला ठेवून, तडजोडीची भूमिका स्वीकारून निर्णय घ्यावे लागतील.. कारण शत्रू पक्षाला संधी लाभली तर स्थिती पालटण्याची शक्यता आहे.
भविष्यात या वेगवेगळ्या विचारधारा किंवा त्यांचे राजकीय पक्ष आणि कृती कार्यक्रमाचं काय होईल? हा प्रश्न तूर्त बाजूला ठेवला तरी वर्तमान राजकीय गरज भागवली जाईल, असं संसाधन अस्तित्वात असणं गरजेचं आहे.
गेली दोन दिवस मुंबईत विरोधी गटाचा मेळावा भरला होता. त्यावर सत्ता पक्षाने टीकात्मक धोरण स्वीकारून नाहक आरोप केले व नॉन इशूचं राजकारण प्रादूर्भित केलं... गोदी मीडियाने दुर्लक्ष केलं. परंतु सोशल मीडियामुळे घराघरात मेळाव्यातील भाषणं, ठराव व भूमिका पोहोचलेली आहे.. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कोट्यवधी दर्शकांनी मेळावा व त्यातील आवाहने ऐकली आहेत.. स्वाभाविक याची सत्तापक्षाने धास्ती घेतली आहे.. ही भीती राजकीय बदलांचे संकेत ठरतील..
वर्तमान राजकीय सत्तेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक जण कंटाळला व वैतागला आहे.. प्रत्येकांचे खिसे वेगवेगळ्या कारणाने रिकामी झालेली आहेत व होत आहेत. हिंदू राष्ट्रवादाच्या मोरल पोलिसिंगमुळे सामाजिक सद्भाव व सहजीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. समाजात अस्वस्थता आणि अशांतता पसरली आहे. धर्मांधतेमुळे प्रत्येक जण गप्प बसलेला आहे. ब्युरोक्रसी, प्रशासन, नोकरदार मुस्कटदाबी सहन करतोय..
राजकीय पक्ष, व्यक्ती तथाकथित भ्रष्टाचार उघडकीस येण्याच्या भयातून आपले गट सत्ता पक्षात विसर्जित करत आहेत.. सामाजिक संघटनांना हिशोबवहीत गुंग ठेवलं आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य राजकीय भूमिका घेण्यास कचरत आहे.. तो राजकारणापासून अनास्था बाळगून आहे.. भ्रष्टाचार, हिंदू राष्ट्रवाद, सांप्रदायिकता, अशांतता आणि सततच्या वादग्रस्त भाषणबाजीमुळे अगतिक झालेला आहे.. या संकट समयी त्याला आश्वासक धोरण व राजकीय व्यवस्था बदलू पाहणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.. त्यामुळे वर्तमान स्थितीत I.N.D.I.A.चा प्रयोग यशस्वी होण्याचे संकेत आहेत.
कलीम अज़ीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com