पुण्यातील गुडलक चौक, वेळ मॉर्निंग
इलेव्हन, “राईट टू लव्ह” नावाचा बॅनर घेऊन काही यंगस्टर्स
उभी होती. येणारे-जाणारे आवार्जून स्टॉप घेऊन यांना पाहत होती. रेड कलरची बलून्स घेऊन
तरुणांचे घोळके चौकाच्या दिशेने येत होती. हळुहळू चौकात तरुण-तरुणींची संख्या वाढू
लागली. बघता-बघता युवक-युवतींची प्रचंड गर्दी चौकात जमली. ‘आम्हाला हवाय राइट टू लव्ह..’ ‘आम्ही चालत
आहोत, जगत आहोत, मरत आहोत फक्त
प्रेमासाठी...’ ‘प्रेम आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचं...’ प्रत्येक फुग्यावर अशा प्रकारचे ‘लव्ह
मॅसेजस्’ होते. सुमारे दिड-एकशे यंगस्टर्स शिस्तीत एका ‘दोन-दोनच्या क्यू’मध्ये थांबून जोरदार घोषणा देऊ
लागली. सपोर्ट टू लव्ह, राईट टू लव्ह..’ ‘माझा देह, माझा हक्क..’ ‘वुई वॉन राईट टू लव्ह..’ ‘त्याने प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, तुमच्या बापाचं काय गेलं..’ तरुणींनी बॅनर्स हात
घेतला, घोषणात ट्रॅफीकचा आवाज लुप्त होत होता. तरुणांचा हा
घोळका फर्ग्युसनच्या दिशेने निघाला. जोरदार घोषणाबाजी सुरु होती, समस्त फर्ग्युसन रोडच्या रहदारीचा भाग होऊन रॅली सुरु होती.
लातूर जिल्ह्यातील अकोली गावातील प्रेमी युगुलास स्वयंघोषित संस्कृती
रक्षकांनी लाथा-बुक्क्याने मारहाण केल्याची न्यूज मागच्या आठवड्यात न्यूज चॅनलने
प्रसारित करताच, राज्यभर संतापाची लाट उसळली. या घटनेनं
राज्यातील समस्त यंगस्टर्स व्यथीत झाला. प्रत्येक स्तरांतून या घटनेचा निषेध होऊ
लागला. याचाच भाग म्हणून पुण्यातील ‘सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठा’च्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या
आजी-माजी विद्यार्थ्यांनी शहरातील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एकत्र करुन गुरुवारी
‘राईट टू लव्ह’ रॅली काढली. या घटनेचे पडसाद सबंध महाराष्ट्रभर उमटले, माध्यमाने याची दखल घेतली परंतु प्रश्न मात्र
सुटले नाहीत. तेवढ्यापुरती चर्चा झाली, आरोपींना अटक झाली पण
हा सततचा प्रश्न सुटणार नाही. एकविसाव्या
शतकात संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली असे अमानुष प्रकार घडत आहेत. सदर व्हिडीओ पाहिल्यास
लक्षात येईल की कार्यकर्त्यांनी तरुणाला हात सुद्धा लावला नाही, परंतु त्या मुलीला किती
निर्दयीपणे मारहाण करत होते. असे प्रकार नेहमी घडतात, पालकांची भिती
दाखवून कधी मारहाण केली जाते, तर कधी लुटले जाते, तर कधी त्याहीपलिकडे जाऊन अनान्वित अत्याचार केले जातात. असे कपल्स
बदनामीच्या भितीपोटी या प्रकाराची व्याच्यता कोठेच नाही, त्यामुळे या गुंडाचे
चांगलेच फावते. अशा प्रवृत्तींना तर
अशा प्रवृत्तींना वचक बसण्याची गरज आहे.
अदीम भारतीय संस्कृतीत प्रेमाची अनेक उदाहरणे मिळतात. तरीही
भारतीय समाजात प्रेमाला विरोध व्हावे हे नवल आहे. प्रेमासंदर्भात ‘वेस्टर्न कंट्रीज्’मध्ये
भारतातील खजुराहो, वात्सायानाची अनेक संदर्भ दिली देतात.
परंतु त्याच भारतात मोठ्या प्रमाणात प्रेमाला विरोध होत असल्याचा इतिहास आहे. काही
संस्कृतीरक्षक आपला राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी वॅलेंटाईनला विरोध करतात.
जोडप्यांना त्रास देतात. पद्धतीला विरोध असेल पण प्रेमविचाराला विरोध हे कितपत
योग्य आहे. प्रेम ही ‘नॅचरल फिलींग’ आहे परंतु समाजात
आजही विरोधी विचाराची संकुचित विचारप्रणाली रुजत आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या गप्पा
सुरु असताना आपण बुरसटलेल्या कल्पना घेऊन वावरत आहोत. याला ‘ऐज्युकेटेड सोसायटी’ म्हणायची का, हा प्रश्न पडतो.
‘लव्ह मॅरेज’ केलेली कपल्सदेखील
प्रेमाला विरोध करण्यात अग्रेसर आहेत. समाजाच्या प्रत्येक स्तरांतून मोठ्या
प्रमाणात प्रेमाला विरोध होत असतो. खाप व जात पंचायतीचे फर्मान तरुणांसाठी घातकी
ठरत आहेत. या पुढारलेल्या समाजात प्रेमाला विरोध व्हावा या गोष्टीचे आश्चर्य
वाटते. शहरी व निमशहरी भागात प्रेम करणार्या अशा
जोडप्यांना मारहाण करणाच्या घटना वाढत आहेत. त्या मारहाणीचे चित्रण करुन त्याच्या व्हिडीओ
क्लिप्स् व्हॉट्स अप फेसबुकवरुन प्रसारित
करायची, ही एक वेगळ्या
प्रकारची विकृती सोशल समाजामध्ये वाढत आहे. अकोलीच्या घट्नेसंदर्भात पोलिसांनीच हा व्हिडीओ आरोपी शोधण्यासाठी व्हॉटस अपवर फिरवला
असल्याचे म्हणले जाते. यामुळे तर आरोपी सापडले पण त्या तरुणीची नाहक बदनामी झाली
त्याचं काय? तंत्रज्ञानाच्या वापराच्या सोयी जेवढ्या आहेत तेवढ्याच
स्वरुपाचे धोके देखील आहेत. हे आपणास कधी कळणार.
लातूरच्या घटनेच्या निमीत्ताने समाजात प्रेमाच्या अधिकाराची
जाणीव व जनजागृती व्हावी, असे अपेक्षित होते
परंतु तसे झाले नाही. पाहिजे त्या प्रमाणात या विषयाची चर्चा झाली नाही. या सबंधी
चर्चा व्हावी हा उद्देश पुण्यातील रॅलीचा उद्देश होता. ‘राईट
टू लव्ह” रॅलीबद्दल बोलताना संयोजक अभिजीत कांबळे म्हणतात “तरुणांना प्रेमाबाबत
व्यक्त व्ह्यायचं असल्यास कुठे व्यक्त व्हावं,
पुणे-मुंबईसारख्या शहरात ठीक आहे, परंतु निमशहरी व ग्रामीण
भागातील तरुणांनी काय करावं. औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात सुद्धा अशा ‘कपल्स’ना मारहाण करुन दमदाटी केली जाते.
म्हैसमाळ, अजिंठा सारख्या भागात गुंडासोबत पोलिसदेखील
लुटतात. या भागात गुंडांनी छेड, विनयभंग, लैंगिक अत्याचार केल्याच्या बातम्या नेहमी वृत्तपत्रात येत असतात हा
प्रकार निंदनिय आहे” हीच का आमची संस्कृती असा सूर रॅलीतून
मोठ्या प्रमाणात येत होता. आम्हाला या रॅलीसाठी डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनने परवानग़ी दिली परंतु बालगंधर्व पोलिस स्टेशनने परवानगी नाकारली,असे म्हणता की, हे जे तुम्ही करताय तेबरोबर नाहीय,आम्ही यास परवानगी नाकारतोय. शेवटी संभाजी उद्यानला या रॅलीचं समापन करायचं होतं ते फर्ग्युसन कॉलेजला समापन करावं लागलं. तर पत्रकारिता करणारा अभिषेक भोसले याबाबत
म्हणतो “मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात असे प्रकार सर्रास होत असतात. हा तरुणांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रताप असून याबाबत
तरुणांमध्ये तसंच समाजाच्या सर्वच घटकांमध्ये प्रेमाच्या अधिकाराविषयी जनजागृती करण्यासाठी
ही रॅली होती. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली निंदनीय प्रकार होऊ नयेत, अशा
प्रकाराकडे पोलिस व गृहमंत्रालयाचे लक्ष वळविण्यासाठी ही प्रतिकात्मक ‘विरोध रॅली’ काढण्यात आली आहे” तथाकथित संस्कृतीरक्षकांना यातून वचक बसावा असा
रॅलीचा उद्देश आहे असेदेखील सहभागी यंगस्टर्स म्हणत होती. ही बाब मेनस्ट्रीम
मीडियाने उचलून धरल्यामुळे याची चर्चा झाली, पण या घटनेला
पेशावर घटनेवर अश्रू ढाळणार्या मंडळीने मुद्दाम बाजूला ठेवले, तरुणांनी सोशल मीडियावर याची चर्चा सुद्धा केली नाही. परंतु तो निंदनीय
व्हिडीओ शेअरींग करण्यास कसलीच कसर सोडली नाही. ही बाब खेदाची आहे. म्हणजे याचा
अर्थ असा की आजच्या तरुणांचा स्वत:चेच प्रश्न कळत नाही. किती दयनीय अवस्था आहे ही
नव्या पिढीची.
जातीव्यवस्थेची दरी कमी करण्यासाठी आंतरजातीय लग्न व्हावीत असे
बाबासाहेबांचं म्हणणं होतं, त्याचाच एक भाग
म्हणून या ‘इंटरकास्ट मॅरेज’कडे पाहावे
लागेल. अशी आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न व्हावे यासाठी शासनाकडून पुरस्कार व विविध
योजना राबविल्या जातात. परंतु अशा तथाकथित संस्कृतीरक्षकांनी जो हाहाकार माजवला
आहे. अशा सोबत
फिरणार्या मुलामुलींना मारहाण करुन त्याचे व्हिडिओ शूट करुन त्याचा सोशल मीडियावर बदनामी करण्याचा अधिकार यांना कोणी दिला. तरूणांवर
बंधने लावणारे हे कोण? आमच्या प्रेमाला नकार देणारे हे कोण? प्रेमी
युगलांना त्रास देण्याचा अधिकार यांना कोणी दिला? प्रेक्षणीय स्थळांवर या
रक्षकांना जोडप्यांना भक्ष्य करण्याचा अधिकार कोणी दिला. अशा प्रकारची दमदाटी करणे
चूकीचं व बेकायदा आहे. या सर्वांच्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. संस्कृती
आम्हाला मारहाणीची शिकवण देत नाही. प्रेम ही नैसर्गिक भावना आहे. त्यात चुकीचे
काही नाही. मात्र, संस्कृतीच्या
नावाखाली प्रेमी युगुलांना त्रास देणाऱ्या लोकांवर प्रशासनाने सक्त कारवाई
करण्याची गरज आहे. अशी मागणी या रॅलीच्या माध्यमातून आली. अशा विकृत
घटकांवर वचक बसावा अशी मागणी या रॅलीच्या
माध्यमातून तरुणांनी व्यक्त केली.
लेखाची मुळ लिंक-http://www.dailyprajapatra.com/oldedition/p-7-m.php?i=25JAN2015

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com